शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण आराखड्यास मान्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:21 IST

अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यास मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी दिला. जिल्ह्यातील ४९७ ...

अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यास मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी दिला. जिल्ह्यातील ४९७ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी विविध ७१२ उपाययोजनांसाठी कामांसाठी १२ कोटी ८५ लाख ७९ हजार रुपयांचा खर्च कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी जानेवारी ते जून या कालावधीसाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्यानुषंगाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक व जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यास मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ८ मार्च रोजी दिला. मान्यता दिलेल्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ४९७ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी विविध ७१२ उपाययोजनांच्या कामांसाठी १२ कोटी ८५ लाख ७९ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.

आराखड्यात प्रस्तावित गावे व उपाययोजनांची संख्या

तालुका गावे उपाययोजना

अकोला ९९ १२०

बार्शीटाकळी ५६ १३८

बाळापूर २९ ६१

पातूर ६७ ८८

मूर्तिजापूर ७५ ९०

अकोट ९७ ९७

तेल्हारा ७४ ११८

............................................................................

एकूण ४९७ ७१२

अशा आहेत प्रस्तावित उपाययोजना

पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात विविध ७१२ उपाययोजनांची कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये ३६ विहिरी खोल करणे व गाळ काढणे, २०० विहिरींचे अधिग्रहण करणे, १० टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, ७० नळयोजनांची विशेष दुरुस्ती, ११ तात्पुरत्या नळयोजना, १८७ नवीन विंधन विहिरी व १४९ नवीन कुपनलिका इत्यादी उपाययोजनांच्या कामांचा समावेश आहे.