शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या शिक्षणासाठी आणखी २४४ बस

By admin | Updated: June 26, 2015 01:06 IST

मानव विकास मिशनचा उपक्रम; ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना गावापासून शाळेपर्यंत मोफत प्रवासाची सोय उपलब्ध.

बुलडाणा : ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना गावापासून शाळेपर्यंत मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करण्यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत आणखी २४४ बस वाढविण्याचा निर्णय शासनाने २३ जून रोजी घेतला. सध्या ६२५ बसद्वारे ही सेवा दिली जाते. नवीन बसेसमुळे मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी मदत होणार आहे. मानव विकास मिशनद्वारे २२ जिल्ह्यातील १२५ तालुक्यात मिशनव्दारे विविध उपक्रम, योजना राबविल्या जातात. या तालुक्यांत आरोग्य सेवा पुरविणे, शैक्षणिक दर्जा उंचावणे, दरडोई उत्पन्न वाढवणे, यासाठी मदत केली जाते. घरापासून शाळेपर्यंंतचे अंतर जास्त असल्याने अनेक मुली शाळा सोडून देतात. काही जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचाही प्रश्न आहे. ही बाब लक्षात घेऊन मानव विकास मिशनतर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी मोफत बससेवा पुरवली जाते. हा उपक्रम चार वर्षापासून सुरू असून सध्या ६२५ बसमधून मुली शाळेत जातात. या बसची बांधणी आणि सेवा राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात येते. या योजनेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन आणखी २४४ बस वाढविण्याचा निर्णय मिशनने घेतला. त्यासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. येत्या शैक्षणिक वर्षात या नवीन बसेस विद्यार्थींंनीच्या सेवेत दाखल होणार आहे. विद्यार्थींंनीसाठी मोफत बस प्रवास योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्यानेच नवीन बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

*एक लाख विद्यार्थीनींची सोय

       मानव विकास मिशनच्या अंतर्गत राज्यात सध्या ६२५ बसेस धावत आहेत. या बसमधून सातवी ते बारावीपर्यंंंतच्या विद्यार्थीनींना गाव ते शाळेपयर्ंत मोफत प्रवास करण्याची सोय आहे. या योजनेतून प्रत्येक तालुक्यात किमान पाच बस देण्यात आल्या आहेत. दहा ते पंधरा गावासाठी एक मार्ग ठरवून देण्यात आला आहे. सध्या सुमारे ७0 ते ७२ हजार विद्यार्थीनींना या योजनेचा लाभ होत असून नवीन बसमुळे आणखी ३0 हजार विद्यार्थीनींची सोय होणार आहे.