शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

नावात कडू असले, तरी कामातून गोडवा निर्माण करू - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:47 IST

नावात कडू असले तरी गोडवा निर्माण करू, असे आश्वासन पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी बुधवारी मुर्तीजापूर तालुक्यातील राजनापूर खिनखिनी येथे ग्रामस्थांशी बोलताना दिले

अकोला : पालकमंत्री म्हणून काम करताना शासकीय योजनांचा लाभ सामान्य गरीब माणसापर्यंत पोहोचवू. हे काम करताना जात,पात, धर्म, पक्ष असा कोणताही भेद न बाळगता सर्वांना सोबत घेऊन काम करू. नावात कडू असले तरी गोडवा निर्माण करू, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, महिला व बालविकास,शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी बुधवारी मुर्तीजापूर तालुक्यातील राजनापूर खिनखिनी येथे ग्रामस्थांशी बोलताना दिले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा ही दिल्या.ना.बच्चू कडू यांनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या दौऱ्याची सुरुवात राजनापूर खिनखिनी येथे दिव्यांगांच्या घराचे गृहप्रवेश व भूमिपूजन करून केली. या प्रसंगी ना.कडू यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी सरपंच प्रगती कडू, प्रांताधिकारी अभयसिंह मोहिते पाटील तसेच अन्य पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी ना.कडू यांनी पुरातन राजेश्वर शिव मंदिरात दर्शन घेतले. सत्कारानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना ते म्हणाले की, सामान्य गोर गरिबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपले शासन सतत प्रयत्न करेल. त्यासाठी लवकरच हेल्पलाईन सुविधा निर्माण केली जाईल. वेळेत आणि दजेर्दार सेवा देऊन उत्तम प्रशासनाचे उदाहरण घालून देऊ, सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करू, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील पहिला दौरा राजनापूर या गावात केला असल्याने हे गाव दत्तक घेतले असल्याची घोषणा केली.यावेळी गावात प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनेतून बांधलेल्या दिव्यांग व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सुरेश शेजव, शुद्धोधन किर्दक, धनराज शेजव, मुंगुटराव शेजव यांच्या घरकुलाचा गृहप्रवेश व नव्याने बांधावयाच्या घरकुलाचे भूमिपूजन केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाBacchu Kaduबच्चू कडू