शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करणार

By admin | Updated: August 17, 2014 01:50 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात उप मुख्यमंत्री पवार यांची घोषणा : मंगळवारी होणार निर्णय.

वाशिम : विदर्भ व मराठवाड्यात पाऊस कमी पडल्यामुळे शेतकरी डबघाईस आला आहे. वाशिम जिल्हय़ातील केवळ वाशिम व रिसोड तालुक्यांचाच समावेश दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला होता. मात्र, मी स्वत: जिल्ह्यातील परिस्थिती पाहिली असता उर्वरित चारही तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करण्यासाठी येत्या मंगळवारी होणार्‍या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेऊ, असे प्रतिपादन आज १६ ऑगस्ट रोजी वाशिम येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री मनोहर नाईक, आमदार ख्वाजा बेग, सुभाषराव ठाकरे, आमदार प्रकाश डहाके, आमदार संदीप बाजोरिया, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, बाबाराव खडसे, पांडुरंग ठाकरे, सोनाली ठाकूर, माधवराव अंभोरे, इमरान कुरेशी, सुनील पाटील, गजानन देशमुख, दिलीप जाधव आदींची उपस्थिती होती. निर्धार मेळाव्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांनी केले. यावेळी निर्धार मेळाव्याला मार्गदर्शन करताना उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप-सेनेवर तोफ डागत महाराष्ट्राला आघाडी सरकारच तारू शकते, असा विश्‍वास दिला. वाशिम जिल्ह्यामध्ये सिंचनाचा प्रश्न मोठा आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने पैनगंगा नदीवर बंधारे बांधून शेतकर्‍यांसाठी सिंचनाच्या व्यवस्थेची वाटचाल सुरू आहे. सद्य: परिस्थितीमध्ये मराठवाडा व विदर्भात पाऊस अल्प असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. मात्र, केंद्रामध्ये असलेल्या भाजप सरकारला याची थोडीही चिंता नाही. केंद्र सरकारने आतापर्यंंत एखादी टीम मराठवाडा व विदर्भाच्या दौर्‍यावर पाठविणे अपेक्षित होते. मात्र, त्यांना शेतकर्‍यांचे आता काही देणे-घेणे नाही. हे आहेत काय त्यांचे अच्छे दिन, असा टोलाही मारण्यास पवार चुकले नाहीत. आता काही महिन्यातच राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यापुढे भाजपच्या खोटारड्या आश्‍वासनाला बळी न पडता आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांंची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन सिंधुताई तुपकर यांनी, तर आभार माजी जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांनी केले.