शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करणार

By admin | Updated: August 17, 2014 01:50 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात उप मुख्यमंत्री पवार यांची घोषणा : मंगळवारी होणार निर्णय.

वाशिम : विदर्भ व मराठवाड्यात पाऊस कमी पडल्यामुळे शेतकरी डबघाईस आला आहे. वाशिम जिल्हय़ातील केवळ वाशिम व रिसोड तालुक्यांचाच समावेश दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला होता. मात्र, मी स्वत: जिल्ह्यातील परिस्थिती पाहिली असता उर्वरित चारही तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करण्यासाठी येत्या मंगळवारी होणार्‍या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेऊ, असे प्रतिपादन आज १६ ऑगस्ट रोजी वाशिम येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री मनोहर नाईक, आमदार ख्वाजा बेग, सुभाषराव ठाकरे, आमदार प्रकाश डहाके, आमदार संदीप बाजोरिया, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, बाबाराव खडसे, पांडुरंग ठाकरे, सोनाली ठाकूर, माधवराव अंभोरे, इमरान कुरेशी, सुनील पाटील, गजानन देशमुख, दिलीप जाधव आदींची उपस्थिती होती. निर्धार मेळाव्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांनी केले. यावेळी निर्धार मेळाव्याला मार्गदर्शन करताना उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप-सेनेवर तोफ डागत महाराष्ट्राला आघाडी सरकारच तारू शकते, असा विश्‍वास दिला. वाशिम जिल्ह्यामध्ये सिंचनाचा प्रश्न मोठा आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने पैनगंगा नदीवर बंधारे बांधून शेतकर्‍यांसाठी सिंचनाच्या व्यवस्थेची वाटचाल सुरू आहे. सद्य: परिस्थितीमध्ये मराठवाडा व विदर्भात पाऊस अल्प असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. मात्र, केंद्रामध्ये असलेल्या भाजप सरकारला याची थोडीही चिंता नाही. केंद्र सरकारने आतापर्यंंत एखादी टीम मराठवाडा व विदर्भाच्या दौर्‍यावर पाठविणे अपेक्षित होते. मात्र, त्यांना शेतकर्‍यांचे आता काही देणे-घेणे नाही. हे आहेत काय त्यांचे अच्छे दिन, असा टोलाही मारण्यास पवार चुकले नाहीत. आता काही महिन्यातच राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यापुढे भाजपच्या खोटारड्या आश्‍वासनाला बळी न पडता आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांंची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन सिंधुताई तुपकर यांनी, तर आभार माजी जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांनी केले.