शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांची शिवभावे, जीवसेवा...

By admin | Updated: September 8, 2015 02:28 IST

पालख्यांचे भक्तिभावात स्वागत.

अकोला : श्रावण महिना म्हणजे शिवभक्तांसाठी एक उत्सवच असतो. अकोल्यातील या लोकोत्सवाला ७0 वर्षांची परंपरा लाभली आहे. दरवर्षी या उत्सवाचे स्वरूप व्यापक होत आहे. शेकडो शिवभक्त मंडळ कावडीद्वारे पूर्णा नदीवरून जल आणून राजराजेश्‍वराला जलाभिषेक करतात. या कावड व पालखी यात्रेकरूंची स्वागत करण्याची अनोखी परंपरा अकोल्यात वर्षानुवर्षांपासून पार पाडली जाते. यावर्षीही शहरातील राजकीय पक्षांसोबतच सामाजिक संघटनांनीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत शिवभक्तांचे जल्लोषात स्वागत केले. सोमवार सकाळपासून कावड यात्रेकरूंचे गांधीग्रामवरून आगमन होण्यास प्रारंभ झाला. थकून-भागून आलेल्या शिवभक्तांसाठी कुणी जलपान, फराळ, चहा, खिचडी, भोजनाचे आयोजन केले होते. शिवभक्तांच्या स्वागताचा प्रारंभ आकोट फैलपासून झाला. शिवाजी पार्कजवळ महापौर उज्ज्वला देशमुख, नगरसेवक सुरेश अंधारे यांनी शिवभक्तांचे स्वागत केले. मनकर्णा प्लॉट येथे कृषी उत्पन्न बाजार समिती हमाल, मापारी कामगार युनियनच्यावतीने चना उसळ, भवानीपेठ मंडळातर्फे खिचडी, चहा व पाण्याचे वितरण करण्यात आले. बगेरे परिवारातर्फे खिचडी वाटप, टिळक रोडवर श्री वीरशैव लिंगायत समाज व बसव विचार समिती, छावा व गांधी चौक नवयुवक मंडळातर्फे पाणी वितरण करण्यात आले. गांधी चौकामध्ये विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे शिवभक्तांना नारळ व शेला देऊन सत्कार करण्यात आला. जयहिंद चौक येथे श्री योगायोग मंडळातर्फे चहाचे तर भाजपतर्फे नगरसेवक सतीश ढगे, राजराजेश्‍वर पालखी उत्सव शांतता समितीचे अध्यक्ष अमर डिकाव, उपाध्यक्ष अश्‍विन पांडे यांच्या हस्ते कावड प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. पप्पू वानखडे व कुटुंबीयांतर्फे राजराजेश्‍वर महाराजांची पूजा करून भाविकांना खिचडीचे वितरण करण्यात आले. राजराजेश्‍वर मंदिराजवळ काली महाराजांच्यावतीने भाविकांचे स्वागत करून प्रसादाचे वितरण करण्यात आले.

 काँग्रेसतर्फे शिवभक्तांचे स्वागत

       कोतवाली चौकामध्ये शहर काँग्रेसच्यावतीने महानगराध्यक्ष मदन भरगड यांनी पालखीतील शिवभक्तांचे स्वागत केले. प्रारंभी त्यांनी राजराजेश्‍वराच्या मानाच्या पालखीचे पूजन करून यात्रेतील भाविकांना प्रसादाचे वितरण केले. कोतवाली चौकात काँग्रेसच्यावतीने भव्य शामियाना उभारण्यात आला होता.

बालशिवभक्त मंडळांची संख्या वाढली

          मोठय़ा शिवभक्त मंडळातील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून, चिमुकली मुलेही त्यांचे अनुकरण करू लागली आहेत. गांधीग्राम येथे जाऊन कावडीने पाणी आणणार्‍या बालशिवभक्त मंडळांमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. यंदाच्या कावड यात्रा उत्सवांमध्ये ३0 च्या जवळपास बालशिवभक्त मंडळ त्यांच्या लहान, परंतु आकर्षक सजावट केलेल्या पालख्या घेऊन कावड यात्रेत सहभागी झाले होते.