शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

अकोला: ६४ खेडी योजनेतून तीन दिवसाआड पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 13:56 IST

६४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून खांबोराजवळील उन्नई बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येते.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खारपाणपट्ट्यातील खांबोरा ६४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या विशेष दुरुस्तीच्या कामासाठी टंचाई अंतर्गत ९९ लाख ३२ हजार ४०० रुपये अंदाजपत्रकीय किमतीच्या प्रस्तावानुसार ७४ लाख ३१ हजार रुपये निधी देण्यास पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने १३ मे रोजी मंजुरी दिल्यानंतर ते काम १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन दिली होती. मुदतीच्या तब्बल तीन महिन्यांनंतर दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. आता योजनेतील गावांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटले आहे.खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून खांबोराजवळील उन्नई बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येते. तेथून योजनेंतर्गत गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो; मात्र पाणी पुरवठा करण्यासाठी १५ वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या पंपांची पाणी फेकण्याची क्षमता कमी झाली आहे. जलवाहिनीही ठिकठिकाणी शिकस्त झाली आहे.त्यामुळे या योजनेंतर्गत गावांना दररोज नियमित पाणी पुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे योजनेंतर्गत गावांना आठ ते पंधरा दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात आला. २०१९ च्या पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात खांबोरा ६४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या विशेष दुरुस्तीचा प्रस्ताव होता. त्यानुसार योजनेवर अवलंबून गावांना दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी योजनेची विशेष दुरुस्ती करणे तसेच या योजनेंतर्गत उगवा गावाचा समावेश करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद मुख्य कार्यकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना सादर केला. खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्ती कामाची अंदाजपत्रकीय किंमत ९९ लाख ३२ हजार ४०० रुपये होती. तो प्रस्ताव आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर करण्यात आला.शासनाने निधी मंजूर करताना त्यामध्ये २५ लाखांची कपात केली. त्यानुसार ७४ लाख रुपये निधी देण्यात आला. निधी देतानाच विशेष दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून केले जाईल. त्यासाठी निविदा प्रक्रिया २९ मेपर्यंत पूर्ण न झाल्यास शासनाची मंजुरी रद्द होईल, तसेच १५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याची डेडलाइनही ठरवून दिली. या दोन्ही मुदतीत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे तब्बल तीन महिने उशीर झाला. गुरुवारी नवीन पंपातून पाणी पुरवठा सुरू झाला. त्यानुसार योजनेतील गावांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. विशेष म्हणजे, आता योजनेच्या दुरुस्तीनंतर देखभाल व दुरुस्ती ग्रामपंचायतमार्फत करावी लागणार आहे.

टॅग्स :Akolaअकोलाwater transportजलवाहतूक