अकोला - महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळाच्या (एमआयडीसी) अकोलास्थित वसाहत क्रमांक ४ मधील मॉ वैष्णवी दाल मिलमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने छापा घालून सुमारे ४0 लाख रुपयांच्या तूर डाळीचा साठा जप्त केला. जिल्हय़ात प्रथमच तूर डाळीचा साठा जप्त करण्यात आला असून, ही कारवाई रविवारी सकाळी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने लालचंद वीरवाणी व विनीत अग्रवाल यांच्या मॉ वैष्णवी दालमिलवर रविवारी सकाळी छापा मारला. यावेळी अवैधरीत्या बोलविण्यात आलेल्या एम एच ३0 एबी ४१५५ क्रमांकाच्या ट्रकमधील सुमारे ४0 लाख रुपयांची ५२0 पोते तूर डाळ जप्त केली. सदर तुरीची डाळ मुंबई किंवा पनवेल या दोन ठिकाणांवरून बोलाविण्यात आल्याची माहिती चालकाने दिली. मात्र, या तूर डाळीची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेली ह्यबिल्टीह्ण, ५२0 पोते तूर डाळीचे देयक, सदर डाळ कोणत्या ठिकाणावरून खरेदी करण्यात आली, या संदर्भात काहीही ठोस पुरावे नसल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जितेंद्र सोनवने यांनी हा डाळीचा साठा जप्त केला.कोणत्याही मालाची वाहतूक करताना त्याची बिल्टी व सदर बिल्टीवर चालकाची स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या ४0 लाख रुपयांच्या तूर डाळीच्या साठय़ाचे कोणतेही ठोस पुरावे वीरवाणी व अग्रवाल या दोघांकडे नाहीत. त्यामुळे हा साठा जप्त करण्यात आला आहे.
अकोला येथे ४0 लाखाचा तूर डाळीचा साठा जप्त
By admin | Updated: October 26, 2015 02:13 IST