शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना संक्रमनाच्या सावटात आमदारांची वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 11:46 IST

MLA in Akola District संपूर्ण वर्ष काेराेनाच्याच सावटात झाकाेळल्या गेल्याने आमदारांच्या कामांवर चांगल्याच मर्यादा आल्या.

ठळक मुद्देरणधीर सावरकर यांना दुसरी टर्म सुरू करतानाच जिल्हाध्यक्षपदाच्या जबाबदारीचा बाेनस मिळाला. गाेवर्धन शर्मा यांनी अखेरच्या क्षणी खेचून आणलेला विजय हा भविष्याच्या राजकारणाचा त्यांना मिळालेला इशारा आहे.

- राजेश शेगाेकार

अकाेला: विधानसभा निवडणुकीचे निकाल २४ ऑक्टाेबर राेजी लागल्यावर आमदार म्हणून निवडून आलेल्या लाेकप्रतिनिधींना आमदारकीची शपथ घेण्यासाठी तब्बल एक महिना प्रतीक्षा करावी लागली. अखेर २८ नाेव्हेंबर राेजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली अन् या लाेकप्रतिनिधींना संवैधानिक आमदार हाेण्याची औपचारिकता पूर्ण करता आली. या नव्या आमदारांच्या कारकिर्दीला आता एक वर्ष पूर्ण झाले; मात्र हे संपूर्ण वर्ष काेराेनाच्याच सावटात झाकाेळल्या गेल्याने आमदारांच्या कामांवर चांगल्याच मर्यादा आल्या.

अकाेल्यात भाजपाचे चार व शिवसेनेचे पाच असे निवडणुकीत शतप्रतिशत यश मिळवून युतीचे आमदार निवडून आले; मात्र राज्यस्तरावर महाविकास आघाडीचे सरकार आल्याने या दाेन्ही पक्षांना एकमेकांच्या विराेधात भूमिका घ्यावी लागली. अकाेला पश्चिम मतदारसंघाचे आमदार गाेवर्धन शर्मा यांनी अखेरच्या क्षणी खेचून आणलेला विजय हा भविष्याच्या राजकारणाचा त्यांना मिळालेला इशारा आहे. जनसंपर्क अन् नम्रता हीच एकमेव शिदाेरी अन बलस्थान असलेल्या आ. शर्मा यांनी ताेच कित्ता नव्या टर्ममध्येही कायम ठेवला. काेराेनाच्या संकटात त्यांच्या समाजकार्याला रामनवमी शाेभायात्रेची मिळालेली साथ ही जमेची बाजू ठरली. शहरी मतदारसंघ असल्याने विकासाची जबाबदारी महापालिकेच्या खांद्यावरच येऊन पडते; मात्र त्यांनी मंजूर करून घेतलेला १५ काेटींचा निधी कायम ठेवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. महापालिकेने केलेला विकास हा पश्चिम मतदारसंघाचा विकास असेल तर महापालिकेच्या अपयश अन घाेटाळ्यांचीही जबाबदारी त्यांच्यावर येणे स्वाभाविकच आहे. अकाेला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांना दुसरी टर्म सुरू करतानाच जिल्हाध्यक्षपदाच्या जबाबदारीचा बाेनस मिळाला. पळसाे बढेच्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमेसाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि यश ही त्यांच्या जमेच्या बाजूची एक बाजू आहेच; मात्र शिवसेनेने भाजपासमाेर विशेषत: महापालिकेत त्यांच्या पक्षाची केलेली काेंडी ते पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कशी फाेडतात यावर त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाचेही मूल्यमापन हाेईल. आमदार नितीन देशमुख यांनी पहिल्याच टर्ममध्ये आक्रमक हाेण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने त्यांच्याच पक्षाचे सरकार आल्यामुळे त्यांनी मतदारसंघासाठी निधी आणण्याचा अन् वळविण्याचाही सपाटा लावला आहे. ताे वानच्या पाणी वळवण्यापर्यंत पाेहोचला आहे; मात्र त्यांच्या वेग पाहता आता पक्षातही सुरू झालेली कुजबुज भविष्यात त्यांच्यासाठी अडचण उभी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अकाेट मतदारसंघातून विजयी झालेले आमदार प्रकाश भारसाकळे यांनी स्वपक्षाच्या विराेधासह मित्रपक्षाचाही विराेध माेडून काढत विजय मिळवला; मात्र गेल्या वर्षभरात काेराेनाच्या सावटात त्यांच्याकडून अपेक्षीत असलेल्या विकासाची गती मंदावलीच आहे. मतदारसंघासाेबतच स्वत:चे आराेग्य सांभाळत त्यांना गेल्या वर्षभरात वाटचाल करावी लागली आहे. मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी शेवटच्या क्षणी आपली जागा कायम ठेवत विजय मिळविल्यामुळे ते आता तरी जनतेत मिसळून काम करतीलए अशी अपेक्षा हाेती; मात्र काेराेनाच्या निमित्ताने त्यांनी अलगीकरणावरच भर देत पक्षाचे कार्यक्रम राबविण्याव्यतिरिक्त फारसे प्रयास केले नसल्याचे चर्चा मतदारसंघात आहे. ते गेल्यावेळी आमदार हाेते त्यावेळी अर्धवट असलेल्या कामांना मार्गावर आणता आणताच काेराेनामुळे लागलेल्या निधीच्या कात्रीची अडचण त्यांच्या समाेर आल्याने विकासाचे प्रगतिपुस्तक सध्या तरी लाल शेऱ्यात आहे. ते पुढील चार वर्षात कसे बदलते, हे कळेलच.

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणPrakash Bharsakaleप्रकाश भारसाकळेRandhir Savarkarरणधीर सावरकरGovardhan Sharmaगोवर्धन शर्माHarish Pimpleहरिष पिंपळे