शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

‘सर्वोपचार’ची ‘ओपीडी’ फुल्ल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 02:13 IST

टायफॉइड, अतिसारचे रुग्ण वाढले; खासगी दवाखान्यांमध्येही रुग्णांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाळ्यात वातावरणात मोठे बदल झाल्याने विषाणूजन्य, कीटकजन्य व जलजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. टायफॉइड, ताप, सर्दी, पडसे, कॉलरा, अतिसार अशा विविध आजारांचे रुग्ण वाढल्याने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) नेहमीपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे चित्र गत दोन आठवड्यांपासून पाहावयास मिळत आहे.पावसाळ्यात सूर्यप्रकाशाचा अभाव व थंड वातावरण यामुळे वातावरणात रोगजंतूंचा प्रादुर्भाव वाढतो. सर्वत्र घाण साचल्याने भूमिगत जलस्रोत दूषित होतात, तसेच साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्तीही वाढीस लागते. रोगजंतूंसाठी असे पोषक वातावरण निर्माण झाल्याने जिल्ह्यात विविध रोगांनी डोके वर काढले आहे. दूषित पाणी पिण्यात आल्याने पोटाचे विकार, जुलाब, हगवण अशी लक्षणे असलेले रुग्ण घराघरांमध्ये आढळून येत आहेत. ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशी लक्षणे असलेले रुग्णही दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत. पावसाळ्यात आर्द्र वातावरणामुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्याने डेंग्यू, मलेरिया या आजारांचा धोका कायम आहे. विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्ण खासगी दवाखान्यांसह सर्वोपचार रुग्णालयात गर्दी करीत आहेत. एरव्ही सर्वोपचार रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज १५०० ते १७०० रुग्ण उपचारासाठी येतात; परंतु गत दीड ते दोन आठवड्यांपासून २००० ते २३०० पर्यंत रुग्ण उपचारासाठी येत असल्याची नोंद सर्वोपचार रुग्णालयात आहे.पुरेसा औषधसाठा उपलब्धपावसाळ्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी दररोज मोठ्या प्रमाणात येणाºया रुग्णांना पुरेल एवढा औषधसाठा सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी सांगितले.