शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

अकोला जिल्ह्यात केवळ १२ टक्के बियाणे विक्री!

By admin | Updated: June 9, 2017 03:53 IST

सोयाबीन बियाण्यांची सर्वाधिक उचल; १५ हजार हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र घटणार!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील काही भागात पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरुवात केली असून, आतापर्यंत ११ ते १२ टक्के बियाणे खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक सोयाबीन बियाण्यांची खरेदी शेतकऱ्यांनी केली आहे. यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र १५ हजार हेक्टरने कमी होण्याची शक्यता आहे. कापसाचे सरासरी पेरणी क्षेत्र गतवर्षीप्रमाणे यावर्षीही कायम आहे.गेल्यावर्षी कापसाला मागे टाकत सोयाबीनने आघाडी घेतली होती. जवळपास २ लाख ३० हजार हेक्टरवर सोयाबीन तर १ लाख २० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा केला होता. यावर्षी सुरुवातीच्या टप्प्यात सोयाबीनची मागणी वाढली असून, एकूण बियाण्यांपैकी ९ हजार ३०० क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे. यावर्षी २ लाख १५ हजार हेक्टरवर कृषी विभागाने सोयाबीनचे नियोजन केले आहे. कापसाचे गतवर्षीप्रमाणे १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्र कायम आहे. जिल्ह्यातील ४ लाख ८६ हजार ६०० हेक्टरसाठी कृषी विभागाने विविध खरीप पिकांचे नियोजन केले आहे. यामध्ये तूर ७० हजार हेक्टर, मूग ३१ हजार हेक्टर, उडीद २० हजार हेक्टर, ज्वारी २२,५०० हजार हेक्टर, बाजरी २२५ हजार हेक्टर, मका ३५० हजार हेक्टर, सूर्यफूल एक हजार हेक्टर तर तिळाचे १ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील या विविध पिकांसाठी कृषी विभागाने ८० हजार ५९४ क्ंिवटल बियाण्यांची मागणी केली आहे. आतापर्यंत बाजारात ६४ हजार ३७८ क्ंिवटल बियाणे उपलब्ध आहे.बाजारात सोयाबीनची मागणी असल्याची माहिती बियाणे विक्रेत्यांनी दिली. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे. त्यांनी मान्सूनपूर्व काही पिकांचे नियोजन केले आहे. मूग, उडीद, तूर व ज्वारी बियाण्यांची अद्याप हवी तेवढी मागणी नाही; पण यावर्षी हा पेरा वाढणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात गत आठवड्यापासून ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस होत आहे. मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला पावसाने हजेरी लावली आहे; पण एक दमदार १०० मि.मी. पाऊस आल्यानंतरच शेतकरी इतर बियाणे खरेदी करतील, असा एकूण प्रत्येक वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.