शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

अकोला जिल्हय़ात ४0 टक्के पाऊस

By admin | Updated: July 25, 2014 01:11 IST

जनजीवन रुळावर; पेरण्यांची लगबग

अकोला: बुधवारी झालेल्या संततधार पावसानंतर गुरुवारी मात्र पावसाने उघाड दिली. २४ जुलैपर्यंत जिल्हय़ात वार्षिक सरासरीच्या ४0 टक्के २८४.६२ मिमी पाऊस झाला. दोन दिवसाच्या झडीनंतर पावसाने उघाड दिल्यामुळे ग्रामीण भागात शेतकर्‍यांनी गुरुवारी मोठय़ा प्रमाणात पेरण्या केल्या. एकाच दिवशी सर्वच शेतकरी पेरणी करीत असल्यामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली होती. मंगळवार व बुधवारी दोन दिवसात अकोला जिल्हय़ात १३९ मिमी पाऊस झाला. जिल्हय़ाची पावसाची सरासरी ६९७.३ मिमी असून, आतापर्यंत २८४.६२ मिमी पाऊस झाला आहे. जिल्हय़ात यावर्षी जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता. १00 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याची सूचना कृषी विद्यापीठ व कृषी खात्याने केली होती. २२ जुलैपर्यंत जिल्हय़ात सरासरी ४0 मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे पेरण्या रखडल्या होत्या. गत दोन दिवसात १३९ मिमी पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.

** ५0 च्यावर जनावरांचा मृत्यू

जिल्हय़ातील शिवणी, शिवर, कुंभारी, सिसा, मासा, उदेगाव या गावातील ५0 च्या वर जनांवरांचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आहे. तर सुमारे ५0 जनावरांची प्रकृती गंभीर आहे. मंगळवार व बुधवारी दोन दिवस जिल्हय़ात संततधार पाऊस झाला. त्यामुळे पशू गोठय़ात किंवा एकाच ठिकाणी होते. या जनांवरांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. जनावरांना दोन दिवस चारा मिळाला नाही. जनावरे पावसामुळे बाहेर चरण्यासाठी जाऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पशुचिकित्सकांनी व्यक्त केला आहे. अवस्थ जनावरांवर उपचार करण्यात येत आहे. या जनांवरांचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध घेण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नीलेश डेहनकर यांनी केली आहे.

** काटेपूर्णाची पातळी वाढली एक टक्क्याने

गत दोन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्हय़ातील धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा प्रकल्पात १९.३६ दलघमी एवढा जलसाठा आहे. याची टक्केवारी २२.४२ टक्के आहे. दोन दिवसांपूर्वी २१.६८ टक्के जलसाठा होता. पातूर तालुक्यातील मोर्णा धरणात १२.७५ दलघमी ३0. ७४ टक्के जलसाठा आहे. निगरुणा प्रकल्पात ६.३१ दलघमी २१.८७ टक्के जलसाठा आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्पात १.१0 दलघमी ९.४३ टक्के जलसाठा आहे. तर दगडपारवा प्रकल्पात अजूनही मृत जलसाठा आहे.