शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

अकोला जिल्ह्यात यंदाही बुडाले मूग, उडदाचे पीक; शेतकरी चिंतेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 11:06 IST

Agriculture News : यंदाही जिल्ह्यात मूग आणि उडदाचे पीक बुडाले असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

- संतोष येलकर 

अकोला: पावसाने दांडी मारल्याच्या परिस्थितीत यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत मूग पिकाची केवळ ४५ टक्के आणि उडीद पिकाची ४३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, पेरणीनंतर उगवलेली पिकेही पावसाअभावी करपली आहेत. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही जिल्ह्यात मूग आणि उडदाचे पीक बुडाले असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

खरीप हंगामात जिल्ह्यातील मूग पेरणीचे सरासरी क्षेत्र २२ हजार ६३७ हेक्टर आणि उडीद पेरणीचे सरासरी क्षेत्र १६ हजार ६५२ हेक्टर आहे. ६५ दिवसांत काढणीला येणाऱ्या पिकांची पेरणी ७ जुलैपर्यंत करता येते, परंतु यंदाच्या पावसाळ्यात १५ जूननंतर पावसाने दांडी मारल्याने, जिल्ह्यात मूग व उडीद पिकाची पेरणी रखडली. त्यामुळे ७ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत मूग पिकाची केवळ ४५.४ टक्के आणि उडीद पिकाची केवळ ४३.८ टक्के क्षेत्रावर पेरणी करण्यात आली. गतवर्षीच्या खरीप हंगामात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्ह्यात हाताशी आलेले मूग व उडदाचे पीक बुडाले होते. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दांडी मारल्याच्या परिस्थितीत जिल्हयातील निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रावर मूग व उडीद पिकाची पेरणी होऊ शकली नाही आणि उगवलेल्या पिकांचेही खरे नसल्याच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणेच यंदाही जिल्ह्यात मूग व उडदाचे पीक बुडाल्याने, शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

मूग व उडीद पेरणीचे असे आहे वास्तव! (हेक्टरमध्ये)

पीक            सरासरी क्षेत्र पेरणीचे क्षेत्र टक्केवारी

मूग             २२६३७             १०२६९             ४५.४

उडीद            १६६५२             ७२९५             ४३.८

 

कपाशीच्या पेऱ्यातही होणार घट; सोयाबीन पेरणीचे क्षेत्र वाढणार!

पावसाने दांडी मारल्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात कपाशीच्या पेऱ्यातही घट होणार आहे. जिल्ह्यात कपाशी पेरणीचे सरासरी क्षेत्र १ लाख ५५ हजार ६८७ हेक्टर इतके असून, त्यापैकी आतापर्यंत केवळ ६२ हजार ६०३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. १५ जुलैपर्यंत कपाशी पिकाची पेरणी करता येणार असून, गत दोन दिवसांपासून पावसाची हजेरी सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर कपाशीची पेरणी सुरू होण्याची शक्यता आहे, परंतु पेरणीचा कालावधी उलटून जात असल्याने, सरासरी क्षेत्राच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात कपाशीची पेरणी कमी होणार असून, सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार आहे.

 

पावसात खंड पडल्याने मूग व उडीद या पिकांच्या पेरणी क्षेत्रात घट झाली आहे, तसेच सरासरीच्या तुलनेत कपाशी पेरणीच्या क्षेत्रातही घट होऊ शकते. पाऊस सुरू झाल्याने रखडलेल्या पेरण्या सुरू झाल्या असून, सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. १५ जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी करता येणार आहे.

- शंकर तोटावार, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती