शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात यंदाही बुडाले मूग, उडदाचे पीक; शेतकरी चिंतेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 11:06 IST

Agriculture News : यंदाही जिल्ह्यात मूग आणि उडदाचे पीक बुडाले असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

- संतोष येलकर 

अकोला: पावसाने दांडी मारल्याच्या परिस्थितीत यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत मूग पिकाची केवळ ४५ टक्के आणि उडीद पिकाची ४३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, पेरणीनंतर उगवलेली पिकेही पावसाअभावी करपली आहेत. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही जिल्ह्यात मूग आणि उडदाचे पीक बुडाले असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

खरीप हंगामात जिल्ह्यातील मूग पेरणीचे सरासरी क्षेत्र २२ हजार ६३७ हेक्टर आणि उडीद पेरणीचे सरासरी क्षेत्र १६ हजार ६५२ हेक्टर आहे. ६५ दिवसांत काढणीला येणाऱ्या पिकांची पेरणी ७ जुलैपर्यंत करता येते, परंतु यंदाच्या पावसाळ्यात १५ जूननंतर पावसाने दांडी मारल्याने, जिल्ह्यात मूग व उडीद पिकाची पेरणी रखडली. त्यामुळे ७ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत मूग पिकाची केवळ ४५.४ टक्के आणि उडीद पिकाची केवळ ४३.८ टक्के क्षेत्रावर पेरणी करण्यात आली. गतवर्षीच्या खरीप हंगामात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्ह्यात हाताशी आलेले मूग व उडदाचे पीक बुडाले होते. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दांडी मारल्याच्या परिस्थितीत जिल्हयातील निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रावर मूग व उडीद पिकाची पेरणी होऊ शकली नाही आणि उगवलेल्या पिकांचेही खरे नसल्याच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणेच यंदाही जिल्ह्यात मूग व उडदाचे पीक बुडाल्याने, शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

मूग व उडीद पेरणीचे असे आहे वास्तव! (हेक्टरमध्ये)

पीक            सरासरी क्षेत्र पेरणीचे क्षेत्र टक्केवारी

मूग             २२६३७             १०२६९             ४५.४

उडीद            १६६५२             ७२९५             ४३.८

 

कपाशीच्या पेऱ्यातही होणार घट; सोयाबीन पेरणीचे क्षेत्र वाढणार!

पावसाने दांडी मारल्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात कपाशीच्या पेऱ्यातही घट होणार आहे. जिल्ह्यात कपाशी पेरणीचे सरासरी क्षेत्र १ लाख ५५ हजार ६८७ हेक्टर इतके असून, त्यापैकी आतापर्यंत केवळ ६२ हजार ६०३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. १५ जुलैपर्यंत कपाशी पिकाची पेरणी करता येणार असून, गत दोन दिवसांपासून पावसाची हजेरी सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर कपाशीची पेरणी सुरू होण्याची शक्यता आहे, परंतु पेरणीचा कालावधी उलटून जात असल्याने, सरासरी क्षेत्राच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात कपाशीची पेरणी कमी होणार असून, सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार आहे.

 

पावसात खंड पडल्याने मूग व उडीद या पिकांच्या पेरणी क्षेत्रात घट झाली आहे, तसेच सरासरीच्या तुलनेत कपाशी पेरणीच्या क्षेत्रातही घट होऊ शकते. पाऊस सुरू झाल्याने रखडलेल्या पेरण्या सुरू झाल्या असून, सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. १५ जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी करता येणार आहे.

- शंकर तोटावार, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती