शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा

By admin | Updated: December 8, 2014 01:42 IST

शेतक-यांना तात्काळ मदत द्या; ‘छावा’च्या नेतृत्वात शेतक-यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक.

अकोला : अत्यल्प पाऊस आणि प्रचंड घटलेले उत्पादन यामुळे जिल्ह्यातील शेतक री मेटाकुटीस आला असून, अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करा तसेच एकरी अनुदान देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसह हजारो शेतकर्‍यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.छावा संघटना व हजारो शेतकर्‍यांनी वसंत देसाई क्रीडांगणावरून भव्य मोर्चा काढला. मध्यवर्ती बसस्थानक चौक, खुले नाट्यगृहासमोरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्ह्यात प्रचंड दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे शेतकरी आपल्याकडील पशुधन कमी किमतीत विक्रीला काढत आहेत. तसे न केल्यास पुढील सहा महिने त्यांच्यापुढे काय मांडावे आणि आपली गुजराण कशी करावी, अशी चिंता शेतकर्‍यांना आहे. शेतकरी अशाप्रकारे प्रचंड मानसिक, आर्थिक अडचणींचा सामना करीत असताना सरकार मात्र मदतीबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. त्यांना तातडीने मदत करण्यात यावी, नरेगा अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पाणंद व शेतरस्त्यांचा कृती आराखडा तयार करून धडक योजनेंतर्गत अंमलबजावणी करावी, शेतकर्‍यांचे पीक कर्ज माफ करावे, सर्व शेतकर्‍यांना हेक्टरी ३0 हजार रुपये मदत जाहीर करावी, पुढील हंगामासाठी शेतकर्‍यांना बी-बियाणे मोफत उपलब्ध करावे, पिकांचा विमा शासनानेच काढावा, सिंचन व रस्त्यांची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी, जिल्ह्यातील आमदार व खासदारांचा निधी जलव्यवस्थापनाकरिता देण्यात यावा आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा संघटना व हजारो शेतकर्‍यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे या मागण्या करण्यात आल्या आहेत.