शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

अखेर टँकर इंधनासाठी दीड कोटी!

By admin | Updated: June 16, 2016 02:20 IST

५५ गावांमधील पाणी पुरवठा होणार सुरळीत; सीईओंचा आदेश.

अकोला: खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी टंचाईग्रस्त ५५ गावांना पाणी पुरवठा करणार्‍या टँकरचा इधन खर्च भागविण्यासाठी अखेर जिल्हा परिषद सेस फंडातून १ कोटी ५0 लाखांचा अग्रिम निधी मंजूर करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अरुण विधळे यांनी बुधवारी दिला. त्यामुळे इंधन खर्चाअभावी ठप्प झालेला ५५ गावांमधील टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. जिल्ह्यातल्या खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६0 गावांना महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो; परंतु गतवर्षी झालेल्या अपूर्‍या पावसामुळे धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे या योजनेंतर्गत गावांना सुकळी येथील तलावातून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला होता. तलाव आटल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ५५ गावांना गत महिन्यापासून २६ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला; मात्र टँकरच्या डिझेलचा खर्च भागविण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने १३ जूनपासून संबंधित गावांमधील टँकरद्वारे पाणी पुरवठा ठप्प झाला. या संदर्भात ह्यलोकमतह्ण ने बुधवारच्या अंकात ह्यटँकरच्या इंधन खर्चाअभावी ५५ गावांचा पाणी पुरवठा ठप्पह्ण असे प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत, सीईओ अरुण विधळे यांनी बुधवारी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता एस.ए. तिडके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांची बैठक घेऊन चर्चा केली. ५५ गावांमध्ये पाणी पुरवठय़ासाठी टँकरच्या इधन व भाडे खर्च भागविण्यासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून १ कोटी ५0 लाखांचा अग्रिम निधी मंजूर करण्यात येत असल्याचा आदेश सीईओ विधळे यांनी दिला. मंजूर करण्यात आलेला निधी गुरुवारी अकोला पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे गत तीन दिवसांपासून ठप्प झालेला टंचाईग्रस्त ५५ गावांमधील टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.