शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

तालुका-जिल्हास्तरावर तयार होणार कृती आराखडा!

By admin | Updated: December 27, 2014 23:46 IST

जलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी.

संतोष येलकर/ अकोला: राज्यातील टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीत जिल्हा आणि तालुकास्तरावर कामांचा आराखडा लवकरच तयार करण्यात येणार आहे. राज्यात जवळपास ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू आणि ५२ टक्के क्षेत्र अवर्षण प्रवण आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, राज्यातील २२ जिल्ह्यांमधील १९ हजार ५९ गावांमध्ये टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. टंचाई परिस्थिती निर्माण झालेल्या गावांमध्ये प्राधान्याने जलयुक्त शिवार अभियान राबविण्याची गरज आहे; तसेच भविष्यात राज्यातील उर्वरित भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी टंचाई परिस्थितीवर मात करण्याकरिता राज्यातील सर्वच जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास शासनाच्या गत ५ डिसेंबर रोजीच्या निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समन्वय समिती, जिल्हास्तरीय समिती आणि तालुकास्तरीय समित्या गठित करण्यात येत आहेत. त्यामध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील गावांची आणि कामांची निवड करून, जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे; तसेच उपविभागीय अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय समित्यांमार्फत सर्व यंत्रणांच्या समन्वयाने तालुकास्तरीय आराखडा तयार करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर तयार करण्यात आलेला आराखडा जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये करावयाच्या कामांचा तालुकास्तरीय कृती आराखडा लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी स्पष्ट केले.