शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

नियमांचे पालन न करणार्‍या कंपन्यांवर कारवाई

By admin | Updated: July 31, 2014 02:09 IST

अकोला मनपाच्या नोटीसकडे मोबाईल कंपन्यांची पाठ

अकोला: मोबाईल टॉवर उभारण्यासंदर्भात राज्य शासनाने नवीन नियमावली लागू केली. त्यानुसार मनपाच्या नगर रचना विभागाने शहरात अधिकृत व बेकायदेशीर टॉवर उभारणार्‍या मोबाईल कंपन्यांना नोटीस जारी केल्या. परवान्याचे नूतनीकरण करताना नवीन निकषामुळे मोबाईल कंपन्यांच्या नाकीनऊ आले आहेत. नगर रचना विभागाला अधिकृत ७0 मोबाईल टॉवरपैकी फक्त २२ टॉवरचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यातही प्रचंड त्रुट्या आहेत. शासन निर्णयाच्या लवचिक धोरणाचा कंपन्या फायदा घेत असल्यामुळे कंपन्यांनी मनपाच्या नोटीसकडे पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे.मोबाईल टॉवर उभारण्यासाठी राज्य शासनाने नवीन धोरण निश्‍चित केले आहे. यापूर्वी शहरात मोबाईल कंपन्यांनी मनमानी पद्धतीने टॉवर उभारले. खासगी जागा, व्यावसायिक संकुल असो वा रहिवासी इमारतींवर मोबाईल टॉवर उभारताना मंजुरीसाठी नगर रचना विभागाच्या जुजबी प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. इमारत मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र घेऊन प्रशासनाकडे सादर केल्यावर अत्यल्प शुल्काची आकारणी करीत प्रशासनाने टॉवर उभारण्याला परवानगी दिली. विविध मोबाईल कंपन्यांनी मनपाच्या लवचिक धोरणाचा फायदा घेत, प्रशासनाकडे टॉवर उभारण्यासंदर्भात अधिकृतपणे नोंदणीच केली नसल्याचे समोर आले. शहराच्या विविध भागात उभारण्यात आलेल्या ११५ मोबाईल टॉवरपैकी फक्त ७0 टॉवरलाच मनपा प्रशासनाकडून अधिकृत मंजुरी देण्यात आली. संबंधित कंपन्यांनी दरवर्षी मोबाईल टॉवरचे नूतनीकरण व परवाना मिळवण्यासाठी शासनाने जारी केलेल्या निकषानुसार प्रस्ताव सादर करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार मनपाने अधिकृत व बेकायदेशीर असलेल्या मोबाईल टॉवरच्या संबंधित कंपन्यांना नोटीस जारी केल्या. ११५ पैकी फक्त २२ कंपन्यांचे प्रस्ताव मनपाला प्राप्त झाले असून, त्यातही प्रचंड त्रुट्या असल्याची माहिती आहे. *निकषांमुळे कंपन्यांचा आखडता हातमोबाईल टॉवर उभारण्यासाठी शासनाने जारी केलेली नियमावली कंपन्यांना डोईजड ठरत आहे. मोबाईल टॉवर उभारणीसाठी महाराष्ट्र रिजनल अँन्ड टाऊन प्लॅनिंग अँक्ट (एमआरटीपी), १९६६ (कलम ४४ ते ४७) अन्वये नगर रचना विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. यामध्ये इमारतींच्या नकाशांना जशी परवानगी घेतली जाते, त्याच पद्धतीने मोबाईल टॉवरची परवानगी घ्यावी लागेल. याकरिता टॉवरची जागा, इमारतीचा नकाशा मनपाकडे जमा करावा लागेल. इमारत टॉवरचा भार पेलण्यास सक्षम आहे, हे सिद्ध करणारा स्ट्रक्चरल ऑडिटरचा रिपोर्ट द्यावा लागेल. तसेच इमारतीमधील ७0 टक्के कुटुंबांचे नाहरकत प्रमाणपत्र बंधनकारक आहे. *स्थानांतरणाशिवाय पर्याय नाही!मोबाईल कंपन्यांनी ज्या इमारतींवर टॉवर उभारले आहेत, त्या इमारतींचे ह्यकम्पिलशन सर्टिफिकेटह्ण सादर करावे लागणार आहे. अर्थातच, शहरात इमारतींचे बांधकाम नियमानुसार नसल्यामुळे सदर प्रमाणपत्र देणे कंपन्यांना शक्य नाही. अशास्थितीत स्थानांतरणाशिवाय मोबाईल कंपन्यांना पर्याय नाही. यामुळे इमारतीपेक्षा खुला भूखंड मिळवण्यासाठी कंपन्यांनी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.