शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

रुजू न होणा-या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 02:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आंतरजिल्हा बदलीने येणाºया शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्यानंतरही ते रुजू होत नसल्यास त्यांच्यावर ७ आॅगस्ट रोजी निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश शासनाने५ आॅगस्ट रोजी दिले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता हा निर्णय असला तरी अकोला जिल्हा परिषदेत शिक्षकांना गेल्या महिनाभरापासून पदस्थापनाच देण्यात आली नाही, हे विशेष.आंतरजिल्हा बदलीने राज्यातील जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आंतरजिल्हा बदलीने येणाºया शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्यानंतरही ते रुजू होत नसल्यास त्यांच्यावर ७ आॅगस्ट रोजी निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश शासनाने५ आॅगस्ट रोजी दिले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता हा निर्णय असला तरी अकोला जिल्हा परिषदेत शिक्षकांना गेल्या महिनाभरापासून पदस्थापनाच देण्यात आली नाही, हे विशेष.आंतरजिल्हा बदलीने राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये रुजू झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबतच्या सूचना ७ जुलै, ३१ जुलै २०१७ रोजीच्या पत्रांतून दिल्या आहेत. त्यानुसार  शिक्षण विभागाने कार्यवाही करणे आवश्यक होते; मात्र त्यानंतर महिनाभरातही आवश्यक ती माहिती न जुळवल्याने शिक्षकांना पदस्थापना आणि रुजू होण्यापासून रोखले जात आहे.  पहिल्या टप्प्यात शासनाने राज्यातील जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचे आदेश दिले आहेत. त्यानुसार इतर जिल्ह्यांतून येणाºया शिक्षकांच्या आदेशाचा भडिमार सुरू आहे. त्यामध्ये अकोला जिल्हा परिषदेत रुजू करून घेण्यासाठी ५० पेक्षाही शिक्षकांचे आदेश आहेत. त्या शिक्षकांना समुपदेशनातून पदस्थापना देण्यासाठी ५ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेत बोलावण्यात आले. समुपदेशनातून पात्र ठरणाºया शिक्षकांना योग्य जागी पदस्थापनेसाठी माहिती उपलब्ध नसल्याने काही शिक्षकांनी तक्रारी केल्या. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी माहिती तयार करून पदस्थापना देण्यासाठी मंगळवारी पुन्हा शिक्षकांना बोलावले.गरोदर, स्तनदा मातांना प्रथम प्राधान्यआंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देताना शिक्षिकांपैकी गरोदर, स्तनदा मातांना प्रथम प्राधान्याने त्यांच्या पसंतीच्या जागेवर पदस्थापना देण्याचे बजावण्यात आले आहे. त्यासोबतच संवर्ग-१ मधील शिक्षकांची पदस्थापना करणे, त्यामध्ये दुर्धर आजारी, पाल्य गतिमंद असणे, दिव्यांग यांचा समावेश आहे. संवर्ग-२ मध्ये पती-पत्नी एकत्रीकरण, त्यांच्या गावातील अंतराची मर्यादा याबाबतची माहिती तर संवर्ग-३ मध्ये असलेल्य सर्वसाधारण शिक्षकांना उर्वरित ठिकाणी पदस्थापना दिली जाणार आहे.पदस्थापनाच नाही, तर कारवाई कुणावर...?शासनाच्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना दिल्यानंतर रुजू न झालेल्या शिक्षकांना ७ आॅगस्ट रोजी निलंबित करण्याचे सांगितले आहे. अकोला जिल्ह्यात शिक्षकांना  पदस्थापनाच दिली नाही तर ते रुजू कसे होणार, त्यामुळे सोमवारी कुणावर कारवाई करणार, हा पेच आहे. शिक्षक रुजू न झाल्यास कारवाई, त्याचवेळी रुजू करून न घेणे, पदस्थापना न देणाºया जिल्हा परिषद प्रशासनाचे काय करावे, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.