शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक शाखेच्या सहा महिन्यांत ६० हजार वाहनांवर कारवाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST

सचिन राऊत अकाेला : वाहतूक शाखा अस्तित्वात आल्यापासून २०२१ या वर्षातील सहा महिन्यांत प्रथमच कारवायांचे सर्व रेकाॅर्ड ब्रेक करण्यात ...

सचिन राऊत

अकाेला : वाहतूक शाखा अस्तित्वात आल्यापासून २०२१ या वर्षातील सहा महिन्यांत प्रथमच कारवायांचे सर्व रेकाॅर्ड ब्रेक करण्यात आलेले आहेत़ जानेवारी ते जून या सहा महिन्यांत तब्बल ६० हजार ३१६ वाहनांवर कारवाया करण्यात आल्या असून त्यांच्याकडून तब्बल ४१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे या कारवाया करताना कडक संचारबंदीही लागू असताना देखील ऐतिहासिक कारवाया झाल्याचे आकडेवारीवरून समाेर आले आहे़

शहर वाहतूक शाखा अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंतच्या सर्वोच्च कारवाया या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांत करण्यात आल्या आहेत़ शहरातील वाहतूक सुरळीत करीत असतानाच वेगवेगळ्या मोहिमा व उपक्रम राबवून या कारवाया करण्यात आल्या आहेत़ महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार काेरोनाचे निर्बंध व संचारबंदी राबवीत असताना या जम्बो करण्यात आलेल्या आहेत़

गत दहा वर्षांतील कारवायांची आकडेवारी

वर्ष कारवाया वसूल दंड

२०१२ ४३४४० ६३, ७८, ६५०

२०१३ ३१५१३ ४५, ५०,३००

२०१४ ३३९८९ ४६, ३९, ८००

२०१५ ४३५१० ५८, ३०,३५०

२०१६ ५०३४४ ७७, ७८, ८००

२०१७ ५७३१९ १, ४३, ८२७००

२०१८ ६३५६७ १,५८, ०६४००

२०१९ ५९५५६ १,२२,५८९००

२०२० ७४१२८ ७१,९४,६००

५० लाखांचा दंड अनेकांकडे थकीत

२०१९ च्या मे महिन्यापासून वाहतूक शाखेच्या दंडात्मक कारवायांसाठी ई चालान मशीनचा वापर करण्यात येत आहे. या कारवाईसाठी चालान करतेवेळी वाहनचालक हजर नसेल तसेच दंड भरण्यासाठी पैसे नसतील तरीही त्यांच्यावर कारवाई झालेली आहे़ अशा प्रकारचा तब्बल ५० लाख रुपयांचा दंड वाहनचालकांकडे थकीत आहे़ हा दंड भरण्यासाठी राज्यातील काेणत्याही शहरातील पाेलिसांकडे दंड भरण्याची सवलत वाहनचालकास देण्यात आली आहे.

वाहनचालकांच्या घरी नाेटीस

ई चालान मशीनद्वारे दंड आकारल्यानंतर अनेक वाहनचालक दंड भरीत नसल्याचे वास्तव आहे़ त्यामुळे अशा वाहन चालकांच्या निवास स्थानी लेखी नोटीस वाहतूक शाखेकडून पाठविण्यात येत आहेत़ पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपाधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी या नाेटीस पाठविल्या आहेत़