शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

लसीकरणाचा वेग वाढला: दहा दिवसांत ४४ हजार लोकांचे लसीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:14 IST

जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात होऊन सुमारे सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १४ लाख ७९ हजार ...

जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात होऊन सुमारे सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १४ लाख ७९ हजार ४४२ लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्टाकडे वाटचाल करीत मागील सहा महिन्यांत आरोग्य विभागाने ४ लाख ४ हजार ४५१ लोकांच्या लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. यामध्ये ३ लाख १६ हजार ५३६ लोकांना पहिला डोस, तर ८७ हजार ९१५ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत जिल्ह्यात लसीकरणाचा वेग कमी होता. मात्र, त्यानंतर १८ वर्षांवरील सर्वांच्याच लसीकरणाला सुरुवात झाल्याने जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला. मागील दहा दिवसांत ४४ हजार लोकांचे लसीकरण झाले असून, सर्वाधिक लसीकरण अकोला तालुक्यात झाले आहे. मात्र, मनपा क्षेत्रात लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे.

अशी आहे जिल्ह्यातील स्थिती तालुका - पहिला डोस - दुसार डोस - एकूण लसीकरण

अकोला - ३०,७३४ - ४,२९७ - ३५,०३१

अकोट - २५,४९६ - ३८७६ - २९,३७२

बाळापूर - २०,३५३ - ३२६४ - २३६१७

बार्शीटाकळी - १७,३४९ - ३०४९ - २०३९८

मूर्तिजापूर - २०,७३६ - २६२९ - २३३६५

पातूर - १७,७०१ - ३२९७ - २०,९९८

तेल्हारा - १९,४६३ - ३९१९ - २३३८२

-------------------------------------

ग्रामीण - २,०१,२५० - ४३,०९१ - २,४४,३४१

मनपा क्षेत्र - १,१५,२८४ - ४४,८२६ - १,६०,११०

एकूण - ३१,६५३४ - ८७९१७ - ४,०४,४५१

लसीचा तुटवडा कायम

जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला. मात्र, मागणीच्या तुलनेत लस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहिमेची गती पुन्हा मंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेषत: दुसऱ्या डोससाठी लसीचे डोस कमी पडत असल्याची माहिती आहे.

तर तिसऱ्या लाटेचा धोका होईल कमी

जिल्ह्यात आतापर्यंत २७.३३ टक्के लाेकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

यातील पहिल्या डोसचे लसीकरण २१ टक्के झाले असून, दुसरा डोस केवळ ५ टक्के लोकांनीच घेतला आहे.

तज्ज्ञांच्या मते, पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कमी होऊ शकतो.

त्या दिशेने वाटचाल सुरू असली, तरी लसीचा तुटवडा मोठी अडचण ठरू शकते.