शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

आयकरदात्या ८,८४४ शेतकऱ्यांनी परत केली नाही ‘पेन्शन’ची रक्कम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST

अकोला : प्रधानमंत्री किसान (पीएम किसान) सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात आयकरदात्या १० हजार ९२३ शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या पेन्शनची रक्कम ...

अकोला : प्रधानमंत्री किसान (पीएम किसान) सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात आयकरदात्या १० हजार ९२३ शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या पेन्शनची रक्कम परत करण्याच्या नोटीस गत नोव्हेंबरमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत बजावण्यात आल्या. त्यापैकी फेब्रुवारीअखेरपर्यंत २ हजार ७९ शेतकऱ्यांनी १ कोटी ८० लाख ७४ हजार रुपयांची रक्कम परत केली असून, उर्वरित ८ हजार ८४४ आयकरदात्या शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या नोटिसीला ठेंगा दाखवत, रक्कम अद्याप परत केली नाही.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांत प्रत्येकी सहा हजार रुपये ‘पेन्शन’ दिली जाते. त्यामध्ये प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपयांची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येते. त्यामध्ये आयकरदात्या शेतकऱ्यांनी योजनेंतर्गत पेन्शनची घेतलेली रक्कम शासन आदेशानुसार परत घेण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण २ लाख २२ हजार ९३२ लाभार्थी असून, त्यापैकी १० हजार ९२३ आयकरदात्या शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेली ८ कोटी २२ लाख ३२ हजार रुपयांची रक्कम परत करण्याच्या नोटीस गत नोव्हेंबरमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत बजावण्यात आल्या आहेत. त्यानुसार गत फेब्रुवारीअखेरपर्यंत २ हजार ७९ शेतकऱ्यांनी १ कोटी ८० लाख ७४ हजार रुपयांची रक्कम केली असून, उर्वरित ८ हजार ८४४ आयकरदात्या शेतकऱ्यांनी ‘पेन्शन’ची रक्कम अद्याप परत केली नाही.

पीएम किसान पेन्शन योजनेचा आढावा

पीएम किसान योजनेचे

जिल्ह्यातील लाभार्थी

२,२२,९३२

पैसे परत करा म्हणून नोटीस पाठविलेले शेतकरी

१०,९२३

आतापर्यंत पैसे परत केलेले शेतकरी

२०७९

पैसे परत करणे बाकी असलेले शेतकरी

८८४४

आतापर्यंत १ कोटी ८० लाख वसूल

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात आयकरदात्या दहा हजार ९२३ शेतकऱ्यांकडून ८ कोटी २२ लाख ३२ हजार रुपये वसूल करावयाचे आहेत. ही रक्कम परत करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत संबंधित शेतकऱ्यांना नोटीस पाठविल्या. मात्र त्यापैकी आतापर्यंत २ हजार ७९ शेतकऱ्यांकडून १ कोटी ८० हजार ७४ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली असून, उर्वरित ८ हजार ८४४ शेतकऱ्यांकडून ६ कोटी ४१ लाख ५८ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात आयकरदात्या १० हजार ९२३ शेतकऱ्यांना पेन्शनची रक्कम परत करण्याच्या नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यापैकी २ हजार ७९ शेतकऱ्यांकडून १ कोटी ८० हजार ७४ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली असून, उर्वरित ८ हजार ८४४ आयकरदात्या शेतकऱ्यांकडून रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

संजय खडसे

निवासी उपजिल्हाधिकारी