शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानवा महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
3
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
4
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
5
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
6
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
7
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
8
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
9
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
10
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
11
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
12
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
13
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
14
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
15
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
16
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
17
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
18
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
19
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
20
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

आयकरदात्या ८,८४४ शेतकऱ्यांनी परत केली नाही ‘पेन्शन’ची रक्कम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST

अकोला : प्रधानमंत्री किसान (पीएम किसान) सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात आयकरदात्या १० हजार ९२३ शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या पेन्शनची रक्कम ...

अकोला : प्रधानमंत्री किसान (पीएम किसान) सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात आयकरदात्या १० हजार ९२३ शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या पेन्शनची रक्कम परत करण्याच्या नोटीस गत नोव्हेंबरमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत बजावण्यात आल्या. त्यापैकी फेब्रुवारीअखेरपर्यंत २ हजार ७९ शेतकऱ्यांनी १ कोटी ८० लाख ७४ हजार रुपयांची रक्कम परत केली असून, उर्वरित ८ हजार ८४४ आयकरदात्या शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या नोटिसीला ठेंगा दाखवत, रक्कम अद्याप परत केली नाही.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांत प्रत्येकी सहा हजार रुपये ‘पेन्शन’ दिली जाते. त्यामध्ये प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपयांची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येते. त्यामध्ये आयकरदात्या शेतकऱ्यांनी योजनेंतर्गत पेन्शनची घेतलेली रक्कम शासन आदेशानुसार परत घेण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण २ लाख २२ हजार ९३२ लाभार्थी असून, त्यापैकी १० हजार ९२३ आयकरदात्या शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेली ८ कोटी २२ लाख ३२ हजार रुपयांची रक्कम परत करण्याच्या नोटीस गत नोव्हेंबरमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत बजावण्यात आल्या आहेत. त्यानुसार गत फेब्रुवारीअखेरपर्यंत २ हजार ७९ शेतकऱ्यांनी १ कोटी ८० लाख ७४ हजार रुपयांची रक्कम केली असून, उर्वरित ८ हजार ८४४ आयकरदात्या शेतकऱ्यांनी ‘पेन्शन’ची रक्कम अद्याप परत केली नाही.

पीएम किसान पेन्शन योजनेचा आढावा

पीएम किसान योजनेचे

जिल्ह्यातील लाभार्थी

२,२२,९३२

पैसे परत करा म्हणून नोटीस पाठविलेले शेतकरी

१०,९२३

आतापर्यंत पैसे परत केलेले शेतकरी

२०७९

पैसे परत करणे बाकी असलेले शेतकरी

८८४४

आतापर्यंत १ कोटी ८० लाख वसूल

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात आयकरदात्या दहा हजार ९२३ शेतकऱ्यांकडून ८ कोटी २२ लाख ३२ हजार रुपये वसूल करावयाचे आहेत. ही रक्कम परत करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत संबंधित शेतकऱ्यांना नोटीस पाठविल्या. मात्र त्यापैकी आतापर्यंत २ हजार ७९ शेतकऱ्यांकडून १ कोटी ८० हजार ७४ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली असून, उर्वरित ८ हजार ८४४ शेतकऱ्यांकडून ६ कोटी ४१ लाख ५८ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात आयकरदात्या १० हजार ९२३ शेतकऱ्यांना पेन्शनची रक्कम परत करण्याच्या नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यापैकी २ हजार ७९ शेतकऱ्यांकडून १ कोटी ८० हजार ७४ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली असून, उर्वरित ८ हजार ८४४ आयकरदात्या शेतकऱ्यांकडून रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

संजय खडसे

निवासी उपजिल्हाधिकारी