शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
9
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
10
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
11
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
12
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
13
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
14
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
15
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
16
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
17
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
18
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
19
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
20
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  

आयकरदात्या ८,८४४ शेतकऱ्यांनी परत केली नाही ‘पेन्शन’ची रक्कम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST

अकोला : प्रधानमंत्री किसान (पीएम किसान) सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात आयकरदात्या १० हजार ९२३ शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या पेन्शनची रक्कम ...

अकोला : प्रधानमंत्री किसान (पीएम किसान) सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात आयकरदात्या १० हजार ९२३ शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या पेन्शनची रक्कम परत करण्याच्या नोटीस गत नोव्हेंबरमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत बजावण्यात आल्या. त्यापैकी फेब्रुवारीअखेरपर्यंत २ हजार ७९ शेतकऱ्यांनी १ कोटी ८० लाख ७४ हजार रुपयांची रक्कम परत केली असून, उर्वरित ८ हजार ८४४ आयकरदात्या शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या नोटिसीला ठेंगा दाखवत, रक्कम अद्याप परत केली नाही.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांत प्रत्येकी सहा हजार रुपये ‘पेन्शन’ दिली जाते. त्यामध्ये प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपयांची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येते. त्यामध्ये आयकरदात्या शेतकऱ्यांनी योजनेंतर्गत पेन्शनची घेतलेली रक्कम शासन आदेशानुसार परत घेण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण २ लाख २२ हजार ९३२ लाभार्थी असून, त्यापैकी १० हजार ९२३ आयकरदात्या शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेली ८ कोटी २२ लाख ३२ हजार रुपयांची रक्कम परत करण्याच्या नोटीस गत नोव्हेंबरमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत बजावण्यात आल्या आहेत. त्यानुसार गत फेब्रुवारीअखेरपर्यंत २ हजार ७९ शेतकऱ्यांनी १ कोटी ८० लाख ७४ हजार रुपयांची रक्कम केली असून, उर्वरित ८ हजार ८४४ आयकरदात्या शेतकऱ्यांनी ‘पेन्शन’ची रक्कम अद्याप परत केली नाही.

पीएम किसान पेन्शन योजनेचा आढावा

पीएम किसान योजनेचे

जिल्ह्यातील लाभार्थी

२,२२,९३२

पैसे परत करा म्हणून नोटीस पाठविलेले शेतकरी

१०,९२३

आतापर्यंत पैसे परत केलेले शेतकरी

२०७९

पैसे परत करणे बाकी असलेले शेतकरी

८८४४

आतापर्यंत १ कोटी ८० लाख वसूल

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात आयकरदात्या दहा हजार ९२३ शेतकऱ्यांकडून ८ कोटी २२ लाख ३२ हजार रुपये वसूल करावयाचे आहेत. ही रक्कम परत करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत संबंधित शेतकऱ्यांना नोटीस पाठविल्या. मात्र त्यापैकी आतापर्यंत २ हजार ७९ शेतकऱ्यांकडून १ कोटी ८० हजार ७४ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली असून, उर्वरित ८ हजार ८४४ शेतकऱ्यांकडून ६ कोटी ४१ लाख ५८ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात आयकरदात्या १० हजार ९२३ शेतकऱ्यांना पेन्शनची रक्कम परत करण्याच्या नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यापैकी २ हजार ७९ शेतकऱ्यांकडून १ कोटी ८० हजार ७४ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली असून, उर्वरित ८ हजार ८४४ आयकरदात्या शेतकऱ्यांकडून रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

संजय खडसे

निवासी उपजिल्हाधिकारी