शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आयकरदात्या ८,८४४ शेतकऱ्यांनी परत केली नाही ‘पेन्शन’ची रक्कम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST

अकोला : प्रधानमंत्री किसान (पीएम किसान) सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात आयकरदात्या १० हजार ९२३ शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या पेन्शनची रक्कम ...

अकोला : प्रधानमंत्री किसान (पीएम किसान) सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात आयकरदात्या १० हजार ९२३ शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या पेन्शनची रक्कम परत करण्याच्या नोटीस गत नोव्हेंबरमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत बजावण्यात आल्या. त्यापैकी फेब्रुवारीअखेरपर्यंत २ हजार ७९ शेतकऱ्यांनी १ कोटी ८० लाख ७४ हजार रुपयांची रक्कम परत केली असून, उर्वरित ८ हजार ८४४ आयकरदात्या शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या नोटिसीला ठेंगा दाखवत, रक्कम अद्याप परत केली नाही.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांत प्रत्येकी सहा हजार रुपये ‘पेन्शन’ दिली जाते. त्यामध्ये प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपयांची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येते. त्यामध्ये आयकरदात्या शेतकऱ्यांनी योजनेंतर्गत पेन्शनची घेतलेली रक्कम शासन आदेशानुसार परत घेण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण २ लाख २२ हजार ९३२ लाभार्थी असून, त्यापैकी १० हजार ९२३ आयकरदात्या शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेली ८ कोटी २२ लाख ३२ हजार रुपयांची रक्कम परत करण्याच्या नोटीस गत नोव्हेंबरमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत बजावण्यात आल्या आहेत. त्यानुसार गत फेब्रुवारीअखेरपर्यंत २ हजार ७९ शेतकऱ्यांनी १ कोटी ८० लाख ७४ हजार रुपयांची रक्कम केली असून, उर्वरित ८ हजार ८४४ आयकरदात्या शेतकऱ्यांनी ‘पेन्शन’ची रक्कम अद्याप परत केली नाही.

पीएम किसान पेन्शन योजनेचा आढावा

पीएम किसान योजनेचे

जिल्ह्यातील लाभार्थी

२,२२,९३२

पैसे परत करा म्हणून नोटीस पाठविलेले शेतकरी

१०,९२३

आतापर्यंत पैसे परत केलेले शेतकरी

२०७९

पैसे परत करणे बाकी असलेले शेतकरी

८८४४

आतापर्यंत १ कोटी ८० लाख वसूल

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात आयकरदात्या दहा हजार ९२३ शेतकऱ्यांकडून ८ कोटी २२ लाख ३२ हजार रुपये वसूल करावयाचे आहेत. ही रक्कम परत करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत संबंधित शेतकऱ्यांना नोटीस पाठविल्या. मात्र त्यापैकी आतापर्यंत २ हजार ७९ शेतकऱ्यांकडून १ कोटी ८० हजार ७४ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली असून, उर्वरित ८ हजार ८४४ शेतकऱ्यांकडून ६ कोटी ४१ लाख ५८ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात आयकरदात्या १० हजार ९२३ शेतकऱ्यांना पेन्शनची रक्कम परत करण्याच्या नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यापैकी २ हजार ७९ शेतकऱ्यांकडून १ कोटी ८० हजार ७४ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली असून, उर्वरित ८ हजार ८४४ आयकरदात्या शेतकऱ्यांकडून रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

संजय खडसे

निवासी उपजिल्हाधिकारी