शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाठीत खंजीर खुपसणारे..."; विराट कोहली-युवराज मैत्रीबाबत युवीच्या वडिलांचे धक्कादायक विधान
2
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
3
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ६०० चिनी जहाजांसह परप्रांतीय बोटींची घुसखोरी
4
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
5
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
6
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
7
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
8
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
9
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
10
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
11
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
12
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
13
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
14
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
15
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
16
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
17
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
18
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
19
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
20
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान

८५0 गावांत पाणीटंचाई निवारणाची कामे पूर्ण!

By admin | Updated: July 25, 2016 01:58 IST

अकोला जिल्ह्यातील ९५ गावांमध्ये १0 कोटींची कामे सुरु; ८६५ कामांवर झाला ११ कोटी खर्च.

संतोष येलकर/ अकोलाजिल्हय़ातील पाणीटंचाई निवारणासाठी गत २१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ८५0 गावांमध्ये विविध उपाययोजनांची ८६५ कामे पूर्ण करण्यात आली असून, या कामांवर ११ कोटी ६ लाख ३८ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला, तसेच जिल्ह्यातील ९५ गावांमध्ये १0 कोटी ५२ लाख ६६ हजार रुपये खर्चाची १२ उपाययोजनांची कामे सध्या सुरू आहेत.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. नदी-नाले आटले होते.त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये विविध १ हजार १ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ९0६ गावांमध्ये २३ कोटी ५३ लाख २५ हजार रुपये खर्चाच्या ९८६ उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांपैकी २१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ८५0 गावांमध्ये ८६५ पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, या कामांवर ११ कोटी ६ लाख ३८ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला.पाणीटंचाई निवारणाच्या कामांना शासनामार्फत ३१ जुलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील ९५ गावांमध्ये १0 कोटी ५२ लाख ६६ हजार रुपये खर्चाची विविध १२ उपाययोजनांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.