शहरं
Join us  
Trending Stories
1
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
2
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
3
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
4
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
5
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
6
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
7
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
8
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
9
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
10
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
11
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
12
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
13
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
14
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
15
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
16
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
17
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
18
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
19
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
20
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वर्षभरात ७७२ जणांना सर्पदंश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:18 IST

जिल्ह्यात सर्पदंशाच्या बहुतांश घटना प्रामुख्याने शेतीकामाच्या वेळी घडल्याचे निदर्शनास येते. प्रामुख्याने पावसाळ्यात शेतात पेरणीला सुरुवात झाल्यानंतर सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ ...

जिल्ह्यात सर्पदंशाच्या बहुतांश घटना प्रामुख्याने शेतीकामाच्या वेळी घडल्याचे निदर्शनास येते. प्रामुख्याने पावसाळ्यात शेतात पेरणीला सुरुवात झाल्यानंतर सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. मागील वर्षभरात ७७२ लाेकांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या. यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या तुलनेत २०१९ मध्ये हे प्रमाण कमी असून, वर्षभरात ७४४ जणांना सर्पदंश झाल्याची नोंद आहे. यामध्ये ५४८ पुरुष, तर १९६ महिलांचा समावेश आहे. २०१९ मध्ये देखील एका व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता.

साप चावल्याचे बळी

२०१९ - १

२०२० - १

जिल्ह्यात लसींचा उपलब्ध साठा

सर्वोपचार रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशासाठी लसींचा साठा मुबलक आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वेळेवर लस उपलब्ध झाल्याने त्यांचा जीव वाचला आहे.

जिल्ह्यात आढळणारे साप

जिल्ह्यात प्रामुख्याने नाग, घोणस, मण्यार, फुरसे हे विषारी साप आढळतात. यासोबतच मांजऱ्या, चिलाटी हे अर्धविषारी साप, तर धामण, अजगर, फुकरी, नानेटी हे बिनविषारी साप आढळतात. याव्यतिरिक्तही सापाच्या विविध प्रजाती जिल्ह्यात आढळून येतात.

साप चावताच काय काळजी घ्यावी

साप चावल्यानंतर सर्वप्रथम दवाखान्यात जावे. ज्या व्यक्तीला साप चावला, त्याला ४८ तास झोपू देऊ नये, त्याला बसवूनच ठेवावे. पायाला चावल्यास पाय खालीच ठेवावा, तर हाताला चावल्यास हात देखील खालीच ठेवावा. दवाखान्यात नेण्यास उशीर होत असल्यास साप चावल्याच्या ठिकाणी एक इंचापर्यंत उभे ब्लेड मारणे. शक्यतोवर हा पर्याय टाळलेला बरा, पण पर्याय नसल्यास हा मार्ग निवडावा, अशी माहिती सर्पमित्र अमाेल नवले यांनी दिली.