शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

६५हजार विहिरींच्या मार्गात मजूरीचा अडसर!

By admin | Updated: March 27, 2015 01:26 IST

कामे बंद होण्याचे प्रमाण वाढले.

अकोला:महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात सुरु असलेल्या ६५ हजार सिंचन विहिरींच्या कामासाठी वाढीव मजूरी आणि साहित्यावरील खर्चाचे प्रमाण राखण्यात प्रशासकीय यंत्रणेला तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने मोठय़ा प्रमाणावर विहिरींची कामे बंद पडू लागली आहेत. राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा)वैयक्तीक लाभाच्या योजनेमधून ६५ हजार सिंचन विहिरींची कामे सुरु आहेत. या कामांसाठी कुशल आणि अकुशल अशा दोन बाबींवर अंदाजपत्रकीय तरतुद केली जाते. सिंचन विहिरींच्या अकुशल कामांचा खर्च ८१८ कोटी तर अकुशल कामांचा खर्च ५९0 कोटी रुपये आहे. यापैकी २0१४-१५ या वर्षात अकुशल बाबींवर ९५ कोटी, तर कुशल बाबींवर २0 टक्के रक्कम खर्च झाल्याची माहिती आहे. या कामांसाठी मजूरी आणि साहित्यावरील खर्चाचे प्रमाण ६0:४0 असे निर्धारित करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात खर्चाचे प्रमाण ७0:३0 असे होत आहे. खर्चाचे प्रमाण लक्षात घेता, विहिरींची कामे पूर्ण करण्यास क्षेत्रीय पातळीवर अडचणी निर्माण होत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये खर्चाचे प्रमाण कसे राखायचे, याबाबत स्पष्टता नसल्याने विहिरींची कामे रखडली आहेत.