शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात ५४६ कोटींच्या पीक कर्जाचे वाटप

By admin | Updated: August 17, 2014 01:50 IST

स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात जिल्हाधिकार्‍यांचे प्रतिपादन

अकोला : राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ५६ हजारांपेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या पिकांचा ५३ कोटी १३ लाख रुपयांचा विमा संरक्षित करण्यात आला आहे.तसेच जिल्ह्यात ५४६ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप शेतकर्‍यांना करण्यात आले आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शुक्रवारी स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित शासकीय मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात जिल्हाधिकारी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिणा, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.एस.एस. वानखेडे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, मनपा आयुक्त महेंद्र कल्याणकर, अपर जिल्हाधिकारी शिवाजीराव दिवेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे,होमगार्डचे जिल्हा समादेशक विजय उजवणे,जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते.पुढे जिल्हाधिकारी म्हणाले की, यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हय़ातील शेतकर्‍यांना ७१९ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी आतापर्यंंत ५४६ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.जिल्ह्यात सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत महसूल विभागामार्फत विविध शासकीय योजना जनतेपर्यंंत पोहोचविण्याचे कार्य करण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्हय़ात ५0 हजारांपेक्षा जास्त लाभार्थींंना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले असून, ई-फेरफार प्रणालीचा प्रारंभ महाराष्ट्रात सर्वप्रथम अकोल्यात करण्यात आला आहे.राज्यस्तरीय योजनेतून जिल्ह्यात १३0 कोटींची विकासकामे मंजूर करण्यात आली असून, त्यामध्ये ७0 कोटींच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वसतिगृह व अतिदक्षता विभागाचे बांधकाम, जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत,जिल्हा न्यायालयाची नवीन इमारत,अकोला उपविभागीय व तहसील कार्यालय इमारत, तेल्हारा तहसील कार्यालय इमारत बांधकामाचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी शिंदे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अंधारे यांनी केले. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.