संतोष येलकर/अकोला : गावांच्या सर्वांंगीण विकासाच्या दृष्टीने आदर्श गाव संकल्प योजनेत पहिल्या टप्प्यात राज्यातील ४७ गावे समाविष्ट करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील १२ गावांचा समावेश आहे.आदर्श गाव संकल्प योजना लोकसहभागातून ग्राम विकास या संकल्पनेवर आधारित आहे. गावाच्या सर्वांंगीण विकासाच्या दृष्टीने शासनामार्फत राबविण्यात येणार्या विविध योजना गावांमध्ये राबविल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने शासनाच्या वेगवेगळ्या १२ विभागांमार्फत राबविल्या जाणार्या ५९ योजनांचा समावेश आहे. आदर्श गाव योजनेंतर्गत राज्यस्तरीय कार्यकारी समिती गठित करण्यात आली असून, या समितीस योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील शंभर गावे निवडण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या अधिकाराच्या अधीन राहून, आदर्श गाव योजनेत पहिल्या टप्प्यात राज्यातील ४७ गावे समाविष्ट करण्यास २२ डिसेंबर रोजी शासनाच्या जलसंधारण विभागाच्या निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. आदर्श गाव योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यातील १२ गावांचा समावेश आहे.आदर्श गाव योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांना, गावाचा सर्वांंगीण विकास करुन घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.या योजनेत ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग महत्वाचा असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक एस.आर.सरदार यांनी स्पष्ट केले. *पाणलोट क्षेत्र विकास योजनेचा गाभा!आदर्श गाव योजनेत विविध १२ विभागाच्या ५९ योजनांचा समावेश आहे. त्यापैकी पाणलोट क्षेत्र विकासाचे काम योजनेचे गाभा क्षेत्र आहे. इतर विभागाचे काम बिगर गाभा क्षेत्र म१हणून वर्गीकरण करण्यात आले आहे.योजनेत समाविष्ट अमरावती विभागातील गावे!जिल्हा संख्या गावांचे नावअमरावती 0३ रामागड,वडाळ गव्हाण,कवठा बहाळे अकोला 0१ कपिलेश्वरवाशिम 0१ साखराबुलडाणा 0२ खेर आणि वकाणायवतमाळ 0५ पाथरट (गोळे), चोंडी, कोठोडा, निंबा, पिंपळदरा......................................एकूण १२
आदर्श गाव योजनेत ४७ गावे !
By admin | Updated: December 25, 2014 23:37 IST