शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

४ लाख १६ हजार हेक्टरवरील पिके बाधित

By admin | Updated: November 21, 2014 02:16 IST

दुष्काळी परिस्थिती: जिल्हाधिकार्‍यांनी अहवाल पाठविला शासनाकडे

अकोला: यावर्षीच्या पावसाळय़ात अल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा अहवाल जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी गुरुवारी शासनाकडे पाठविला आहे. या अहवालानुसार खरीप हंगामात जिल्ह्यात तब्बल ४ लाख १६ हजार ७८६ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याची बाब समोर आली आहे.यावर्षीच्या पावसाळय़ात उशिरा आलेला पाऊस आणि अल्प पावसामुळे जिल्ह्यात खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक शेतकर्‍यांच्या हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली. पिकांचे उत्पादन बुडाल्याने, शेतकरी हवालदिल झाला. जिल्हाधिकार्‍यांकडून गेल्या शनिवारीच जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यातील सर्वच गावांची सरासरी पैसेवारी ४१ पैसे म्हणजेच ५0 पैशांच्या आत आहे. त्यामुळे जिल्हय़ातील दुष्काळी परिस्थितीचे वास्तव समोर आले. पैसेवारी कमी असल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश शासनामार्फत जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांच्या तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा अहवाल जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी गुरुवारी शासनाकडे पाठविला. या अहवालानुसार २0१४ च्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण ४ लाख १८ हजार ९१४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली. त्यापैकी तब्बल ४ लाख १६ हजार ७९६ हेक्टर ५५ आर क्षेत्रावरील पिकांचे क्षेत्र बाधित झाले. त्यामध्ये जिरायती व बागायती आणि बहुवार्षिक फळपिकांच्या क्षेत्राचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीत लाखो हेक्टरवरील पिके हातून गेल्याने, जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारकांसह २ लाख ९७ हजार २२१ शेतकर्‍यांना फटका बसला. नापिकीमुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडल्याचे चित्र आहे.