शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
3
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
4
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
5
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
6
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
7
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
8
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
9
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
10
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
11
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
12
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
13
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
14
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
15
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
16
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
17
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
18
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
19
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
20
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?

विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये अकोल्यातील ३९ विद्यार्थ्यांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 02:40 IST

दुस-या निवड चाचणीसाठी पात्र.

अकोला : इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टिचर संस्थेच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या विज्ञान ऑलिम्पियाड परीक्षेत अकोल्यातील ३९ विद्यार्थ्यांनी बाजी मारली. हे विद्यार्थी परीक्षेच्या दुसर्‍या निवड चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टिचर या संस्थेच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर विज्ञान ऑलिम्पियाड परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र आणि गणित, या विषयांवर आधारित असून, इयत्ता १0 वी नंतरचे विद्यार्थी परीक्षेला पात्र ठरतात. यंदा विज्ञान ऑलिम्पियाड परीक्षेला १ लाख ३२ हजार विद्यार्थी बसले होते. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ दहा टक्के विद्यार्थ्यांची निवड ही दुसर्‍या चाचणीसाठी करण्यात येते. त्या अनुषंगाने २७ डिसेंबरच्या दरम्यान निकाल जाहीर झाला असून, यामध्ये देशभरातून १३ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये अकोल्यातील ३९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षेच्या दुसर्‍या निवड चाचणीतून देशभरातील केवळ ३0 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. या चाचणीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांंसाठी २0 दिवसांची कार्यशाळा घेण्यात येणार असून, या ठिकाणी त्यांना देशातील तज्ज्ञ वैज्ञानिक मार्गदर्शन करणार आहेत. मार्गदर्शन कार्यशाळेतून आंतरराष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाड परीक्षेसाठी केवळ ५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर हे पाच विद्यार्थी भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, त्यांची जबाबदारी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजीतर्फे घेण्यात येणार आहे. गणित विषयात विदर्भातील ५ विद्यार्थ्यांंची निवड विज्ञान ऑलिम्पियाड परीक्षेत गणित विषयातून विदर्भातील ५ विद्यार्थ्यांंची निवड झाली. यामध्ये अकोल्यातील राम राखुंडे या विद्यार्थ्याचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांंसाठी पुणे येथील भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या वतीने ४ दिवसीय कार्यशाळा आयोजित केली असून, राम राखुंडे हा पुण्यासाठी रवाना झाला आहे.