शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अद्यापही ३८ टक्के रब्बी क्षेत्र नापेर!

By admin | Updated: December 7, 2015 02:31 IST

खरिपानंतर रब्बीवर परिणाम; तीव्र पाणीटंचाई.

अकोला : अल्प पावसाची झळ खरीप हंगामातील सर्वच पिकांना बसली. या परिस्थितीत रब्बी साथ देईल, अशी शेतकर्‍यांना आशा होती. परंतु भेगाळलेल्या शेताची स्थिती बघता आजमितीस पश्‍चिम विदर्भातील ३८ टक्के रब्बी क्षेत्र नापेर आहे. जमिनीत ओलावा नसल्याने पेरणी केलेल्या पिकांची वाढ खुंटल्याने पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांची झोप उडाली आहे. तसेच पाणीटंचाईचा सामना करताना शेतकर्‍यांना गुरांचा सांभाळ करणे कठीण झाले आहे.आतापर्यंंंत पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ांत ६२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पण, ज्या शेतकर्‍यांनी विविध रब्बी पिकांची पेरणी केली आहे. त्या पिकांसाठी लागणारा ओलावा जमिनीत नसल्याने रब्बी पिकांची अवस्था वाईट आहे. बहुतांश ठिकाणी हरभरा एकतर उगवला नाही, आणि जेथे उगवला तेथे कीड, मर रोगाने उच्छाद मांडला आहे. ज्या शेतकर्‍यांकडे संरक्षित पाण्याची सोय आहे; परंतु यावर्षी अपेक्षित जलसाठा संकलित झाला नसल्याने तेथे सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे अपेक्षित उत्पादनाची शाश्‍वती कमीच वाटत असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.यावर्षीचा खरीप हंगाम हातचा गेल्याने रब्बी हंगामावर शेतकर्‍यांची भिस्त होती; परंतु परतीच्या पावसानेही दगा दिल्याने रब्बी हंगामातील उत्पादनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तथापि, कोरडे शेत ठेवून करायचे काय, म्हणून शेतकर्‍यांनी छातीवर दगड ठेवून रब्बीची पेरणी केली आहे. अमरावती विभागात ५.९३ लाख हेक्टर रब्बीचे सरासरी क्षेत्र आहे. तथापि कृषी विभागाने यावर्षी ९ लाख ५७ हजार हेक्टर पेरणीचे नियोजन केले होते. परंतु आतापर्यंंंत ३.६८ लाख हेक्टरवर पेरणी झाली असूून, उर्वरित उद्दिष्ट साध्य होते की नाही, याकडे कृषी विभागाचे लक्ष लागले आहे.