शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

२७ जनावरांचा जळून कोळसा

By admin | Updated: January 31, 2015 00:55 IST

बुलडाणा तालुक्यातील घटना; आगीत शेती उपयोगी साहित्यही भस्मसात.

धाड (जि. बुलडाणा): येथील एका शेतकर्‍याचे शेतातील गोठय़ास २९ जानेवारी रोजी रात्री अचानक आग लागून तब्बल २७ जनावरे गोठय़ात बांधल्या जागी जळून कोळसा झाली तर तीन जनावरे गंभीर भाजली. या आगीमध्ये शेतकर्‍याचे शेती उपयोगी साहित्यासह ५ लाख ५१ हजार ४00 रुपयांचे नुकसान झाले आहे. बुलडाणा तालुक्यात येत असलेल्या धाड येथील रहिवासी असणारे शेतकरी गुलाबराव संपत गुजर याची गट नं. २८८ शेतीमध्ये असणार्‍या गोठय़ास २९ जानेवारी रोजी रात्री १0 वा. सुमारास अचानक आग लागली. या घटनेची माहिती त्यांना मिळाल्यावर त्यांच्यासह गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र तोवर संपूर्ण गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता, तरीही जळत्या गोठय़ातून नागरिकांनी होरपळलेली गाय, गोर्‍हा व एक बोकड बाहेर काढला, ते गंभीर भाजले होते. या आगीमध्ये गुलाबराव गुजर यांचे एक म्हैस, २0 मोठय़ा बकर्‍या, ६ पिल्लं जागेवरच जळून कोळसा झाले तर ५0 टीनपत्रे, दोन स्प्रिंकलर संच व इतर कृषी साहित्य व जनावरे मिळून ५ लाख ५२ हजाराचे नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनास्थळी आज सकाळी तहसीलदार दीपक बाजड, मंडळ अधिकारी शेळके, तलाठी किशोर कानडजे, धनंजय शेवाळे, गवळी व कोतवाल बापु तोटे यांनी भेट देऊन पंचनामा केला तर पशु वैद्यकीय अधिकारी पाचारणे यांनी जनावरांची उत्तरीय तपासणी केली. या घटनेत नुकसानग्रस्त शेतकर्‍यास तत्काळ आर्थिक मदतीची मागणी होत आहे.