शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

२७ जनावरांचा जळून कोळसा

By admin | Updated: January 31, 2015 00:55 IST

बुलडाणा तालुक्यातील घटना; आगीत शेती उपयोगी साहित्यही भस्मसात.

धाड (जि. बुलडाणा): येथील एका शेतकर्‍याचे शेतातील गोठय़ास २९ जानेवारी रोजी रात्री अचानक आग लागून तब्बल २७ जनावरे गोठय़ात बांधल्या जागी जळून कोळसा झाली तर तीन जनावरे गंभीर भाजली. या आगीमध्ये शेतकर्‍याचे शेती उपयोगी साहित्यासह ५ लाख ५१ हजार ४00 रुपयांचे नुकसान झाले आहे. बुलडाणा तालुक्यात येत असलेल्या धाड येथील रहिवासी असणारे शेतकरी गुलाबराव संपत गुजर याची गट नं. २८८ शेतीमध्ये असणार्‍या गोठय़ास २९ जानेवारी रोजी रात्री १0 वा. सुमारास अचानक आग लागली. या घटनेची माहिती त्यांना मिळाल्यावर त्यांच्यासह गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र तोवर संपूर्ण गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता, तरीही जळत्या गोठय़ातून नागरिकांनी होरपळलेली गाय, गोर्‍हा व एक बोकड बाहेर काढला, ते गंभीर भाजले होते. या आगीमध्ये गुलाबराव गुजर यांचे एक म्हैस, २0 मोठय़ा बकर्‍या, ६ पिल्लं जागेवरच जळून कोळसा झाले तर ५0 टीनपत्रे, दोन स्प्रिंकलर संच व इतर कृषी साहित्य व जनावरे मिळून ५ लाख ५२ हजाराचे नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनास्थळी आज सकाळी तहसीलदार दीपक बाजड, मंडळ अधिकारी शेळके, तलाठी किशोर कानडजे, धनंजय शेवाळे, गवळी व कोतवाल बापु तोटे यांनी भेट देऊन पंचनामा केला तर पशु वैद्यकीय अधिकारी पाचारणे यांनी जनावरांची उत्तरीय तपासणी केली. या घटनेत नुकसानग्रस्त शेतकर्‍यास तत्काळ आर्थिक मदतीची मागणी होत आहे.