शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

१८७२ जागांसाठी २४ हजार अर्ज

By admin | Updated: July 26, 2014 22:56 IST

आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू : अनेक विद्यार्थी राहणार वंचित

बुलडाणा: यावर्षी दहाविमध्ये मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थी पास झाल्यामुळे सुरूवातीपासूनच महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी प्रचंड स्पर्धा निर्माण झाली होती. त्यामुळे आयटीआयकडे सुध्दा विद्यार्थ्यांचा ओढा दरवर्षीच्या प्रमाणात अधिक आहे. अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत उपलब्ध असलेल्या विविध ट्रेडच्या जागा पेक्षा हजारो अर्ज प्राप्त झाल्याने जागे अभावी शेकडो विद्यार्थी प्रवेशा पासून वंचित राहणार आहेत. अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत १८७२ जागा असून त्यासाठी २४ हजार विद्यार्थ्यांंनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. २८ जुलै पासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. ईयत्ता दहावीचे निकाल लागल्या नंतर आयटीआय प्रवेश प्रक्रिया प्रत्यक्षात १0 जुलैपासून सुरु करण्यात आली. त्या नंतर ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता विद्यार्थ्यांची एकच धावपळ सुरू झाली होती. साधरण ग्रामीण भागातील आर्ट आणि कॉर्मसच्या विद्यार्थ्यांचा ओढा आयटीआय कडे अधिक असतो. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्याभरातील विद्यार्थ्यांंनी मलकापूर रोड वरील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत एकच गर्दी केली होती. तर शहरातील अन्य संगणकीय केंद्रावर विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. बुलडाणा जिल्ह्यात आयटीआय प्रवेशाकरिता ५६४ एवढी विद्यार्थ्यांची क्षमता असून १४ व्यवसायासाठी विविध ट्रेडमध्ये विद्यार्थ्यांंना प्रवेश देण्यात येते. मात्र यावर्षी क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आयटीआयकडे प्राप्त झाल्याने यामधील काही विद्यार्थ्यांना प्रवेशा पासून वंचित राहावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासगी क्षेत्रामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना अधिक पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांची शासकीय संस्थेमध्ये प्रवेश मिळविण्याकरिता धाव घेतात. मात्र यंदा विद्यार्थी संख्या अधिक असल्याचे दिसून येते. येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये १ आणि २ वर्षाच्या कोर्ससाठी १४ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. जिल्ह्यात नेमक्या ५६४ जागा असताना ६ हजार ५७७ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून नुकतीच गुणवत्ता यादी लावण्यात आली आहे. बुलडाणा येथील प्रशिक्षण संस्थेत १ हजार प्रवेश निश्‍चित झाले आहेत. अकोला जिल्ह्यात विविध ट्रेडसाठी १८७२ जागा आहेत. मात्र येथे सुध्दा १0 हजार विद्यार्थ्यांंचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे. तर वशिम जिल्ह्यात ३७0 जागा असताना येथे जवळपास ८ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. जागा कमी व अर्ज मोठय़ा प्रमाणावर प्राप्त झाल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांंना प्रवेशापासुन वंचित राहावे लागणार आहे.