शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

रोज २0 टन कांदा, बटाट्याचा साठा, आता प्रतीक्षा साठा निश्‍चितीची

By admin | Updated: July 7, 2014 00:55 IST

अकोला-जिल्ह्यात रोज कांदा आणि बटाट्याची प्रत्येकी ४0 टन उलाढाल होते.

अकोला-जिल्ह्यात रोज कांदा आणि बटाट्याची प्रत्येकी ४0 टन उलाढाल होते. सरकारने कांदा आणि बटाट्याचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये केल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही पाहणी करण्यात आली. जिल्ह्यात रोज कांदा आणि बटाट्याची प्रत्येकी २0 टन खरेदी-विक्री होते. अर्थात रोज २0 टनापेक्षा जास्त कांदा आणि आलूचा साठा होतो. त्यामुळे आता शेतकरी आणि व्यापार्‍यांचे साठा निश्‍चितीकडे लक्ष लागले आहे. दिवसेंदिवस भाजीपाल्यासह कांदा, बटाट्यांच्या किंमती वाढतच आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा आणि बटाट्याचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये केल्यानंतर साठेबाजीला लगाम लागणार आहे. व्यापार्‍यांच्या कांदे-बटाट्याच्या साठय़ाची र्मयादा ठरविण्याचे आदेशही केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. राज्यातील कांदा आणि बटाट्याचे उत्पादन लक्षात घेऊन साठय़ाची र्मयादा निश्‍चित करण्यात येणार आहे. कांदा आणि बटाट्याला कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातून एका वर्षासाठी बाहेर काढण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी कोणालाही कांदा व बटाटे विकू शकतील आणि याला बाजार समिती अटकाव करू शकणार नाही. दरम्यान, अकोल्यात वाडेगावसह वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातून कांदा विक्रीसाठी येतो. अकोल्यात कांदा- बटाटे खरेदीदार कमी असून, केवळ कमिशन तत्त्वावरच खरेदी-विक्री होते. बाजार समिती परिसरात अनेक व्यापार्‍यांनी कांदे आणि बटाट्यांची साठवणूक केली आहे. राज्य सरकारने साठा निश्‍चित केल्यानंतर साठेबाजीबाबत कारवाई होणार आहे. ** मोठे व्यापारी बनले शेतकरी जिल्ह्यात कांदा-बटाट्यांची कमिशन तत्त्वावर खरेदी-विक्री करणारे अनेक व्यापारी आहेत. हे व्यापारीच शेतकरीही आहेत. त्यामुळे साठा निश्‍चित करताना नेमके कोणते निकष लावण्यात येतात, याकडे व्यापार्‍यांचे लक्ष लागले आहे. अद्याप केंद्र आणि राज्य सरकारने अध्यादेश जारी केलेला नाही.