शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

१६ लाख क्विंटल तुरीची खरेदी दोन दिवसात होणार सुरु!

By admin | Updated: July 5, 2017 01:03 IST

सोमवारपर्यंत चुकारे : मुख्यमंत्र्यांचे आ. बच्चू कडू यांना आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नोंदणी करण्यात आलेल्या आणि टोकन देण्यात आलेल्या अकोला जिल्ह्यासह अमरावती विभागातील शेतकऱ्यांची १६ लाख १० हजार ५०० क्विंटल तूर खरेदी दोन दिवसात सुरू करण्यात येणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू यांना मंगळवारी दिले. तसेच विभागातील तूर खरेदीचे थकीत ७४ कोटी ८२ लाख रुपयांचे चुकारे सोमवारपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी (डीएमओ) दिले. त्यामुळे यासंदर्भात शेतकरी जागर मंचच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले आहे.शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हमी दराने ‘नाफेड’द्वारे दोन महिन्यांपूर्वी खरेदी करण्यात आलेल्या तुरीच्या रकमेचे चुकारे अद्याप शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. तसेच नाफेडमार्फत तूर खरेदी बंद करण्यात आल्यानंतर नोंदणी करण्यात आलेल्या आणि टोकन देण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीचे अद्याप मोजमाप करण्यात आले नाही. त्यामुळे या प्रश्नावर आक्रमक झालेल्या आ. बच्चू कडू यांच्यासह शेतकरी जागर मंच व प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यातील जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयात जाऊन, जिल्हा मार्केटिंग अधिकारी (डीएमओ) बजरंग ढाकरे यांना घेराव घातला. घटनेची माहिती मिळताच शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तूर खरेदीचे चुकारे तातडीने शेतकऱ्यांना देण्यात यावे आणि टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी सुरू करण्यात यावी, त्याशिवाय आम्ही येथून उठणार नाही, अशी भूमिका आ. बच्चू कडू यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतली. तसेच यासंदर्भात आ. बच्चू कडू व जिल्हा मार्केटिंग अधिकारी ढाकरे यांनी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह फेडरेशचे व्यवस्थापकीय संचालक जे.पी. गुप्ता व सचिव विजय कुमार यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर अकोला जिल्ह्यातील तूर खरेदीच्या थकीत चुकाऱ्यापोटी २० कोटी रुपयांसह अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील तूर खरेदीचे ७४ कोटी ८२ लाख रुपयांच्या चुकाऱ्याची रक्कम सोमवार, १० जुलैपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर रात्री ८ वाजता घेराव आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर तूर खरेदीच्या मुद्द्यावर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी आ. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. नोंदणी करण्यात आलेल्या आणि टोकन देण्यात आलेल्या अकोला जिल्ह्यासह अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची १६ लाख १० हजार ५०० क्विंटल तूर खरेदी दोन दिवसात सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. बच्चू कडू यांना दिले. त्यानुसार अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मोजमाप बाकी असलेल्या १४ हजार ७१३ क्विंटल तुरीसह टोकन देण्यात आलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील ३ लाख ५२ हजार २३७ क्विंटल तूर खरेदीची प्रक्रिया दोन दिवसात सुरू होणार आहे. अकोला जिल्ह्यासह अमरावती विभागात तूर खरेदी दोन दिवसात सुरू होणार असल्याने, यासंदर्भात शेतकरी जागर मंचच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले आहे. यावेळी शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, नीलेश ठोकळ, अतुल काळणे, मनोज तायडे, जगदीश मुरुमकार, शिवाजी म्हैसने यांच्यासह प्रहार संघटना व शेतकरी जागर मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.