शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

पाणीटंचाई निवारण्यासाठी १४३.३५ कोटीचा निधी

By admin | Updated: October 13, 2015 22:43 IST

शासनाने हाती घेतल्या तात्काळ उपाययोजना; अमरावती विभागाला १२.५५ कोटीचा निधी.

संतोष वानखडे/वाशिम : २0१५-१६ या वर्षात पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासाठी शासनाने चार विभागांसाठी १४३ कोटी ३५ लाख ११ हजार रुपयांचा निधी १२ ऑक्टोबरला मंजूर केला. पावसाचे कमी प्रमाण आणि त्यातच जलपुनर्भरण व अन्य जलसंधारणच्या कामांबाबत जनजागृतीचा अभाव यामुळे जलपातळीत घट होत चालली आहे. यामुळे राज्यातील कित्येक गावांमध्ये हिवाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाणीटंचाईचे सावट असते. उन्हाळ्यात बहुतांश गावे पाणीटंचाईच्या चटक्याने होरपळून जातात. यावर्षी तर भर पावसाळ्यातही राज्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागल्याचे विदारक चित्र आहे. पाणीटंचाईची धग कमी करण्यासाठी विंधन विहिर, नळ योजनांची विशेष दुरूस्ती, तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना, टँकरने पाणीपुरवठा, विहिर अधिग्रहण, गाळ काढणे आदी उपाययोजनांवर भर दिला जातो. २0१५-१६ या वर्षात पाणीटंचाईवर तात्पुरती मात करण्यासाठी राबविलेल्या व राबविण्यात येणार्‍या उपाययोजनांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची मागणी प्रशासनाने केली होती. या मागणीची दखल म्हणून कोकण, नाशिक, औरंगाबाद व अमरावती या चार विभागांसाठी १४३ कोटी ३५ लाख ११ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. कोकण विभाग ७.१६ कोटी, नाशिक विभाग २७.६४ कोटी, औरंगाबाद विभाग ९५.९८ कोटी व अमरावती विभाग १२.५५ कोटी रुपये असे निधीचे वाटप शासनाने केले आहे. सर्वाधिक अर्थात ९५.७५ कोटी रुपये खर्च ह्यटँकरने पाणीपुरवठाह्ण या सदराखाली होणार आहे. त्याखालोखाल नळ योजनांची विशेष दुरूस्ती १७.७८ कोटी, विहिर अधिग्रहण १५.८३ कोटी, विंधन विहिर ९.१७ कोटी आणि तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनेवर ४.९४ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

*अमरावती विभागाला १२.५५ कोटी

         अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील पाणीटंचाई निवारणार्थ विविध उपाययोजना राबविल्या व आताही राबविल्या जात आहेत. पैशाअभावी उपाययोजना ठप्प पडू नये म्हणून शासनाने अमरावती विभागासाठी १२ कोटी ५५ लाख २८ हजाराचा निधी मंजूर केला. विंधन विहिरींसाठी १.८२ कोटी, नळ योजनांची विशेष दुरूस्ती ५.0६ कोटी, तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना १.0९ कोटी, टँकरने पाणीपुरवठा २.११ कोटी, विहिर अधिग्रहण २.४३ कोटी अशा प्रमुख उपाययोजनांचा समावेश आहे.