शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

१४ गावांचा संपर्क तुटला!

By admin | Updated: July 13, 2016 01:58 IST

अकोला जिल्हय़ातील चार तालुक्यात अतिवृष्टी: नाल्याच्या पुरात एक जण वाहून गेला.

अकोला: अतिवृष्टी आणि नदी-नाल्यांना पूर आल्याने जिल्हय़ात मंगळवारी जनजीवन विस्कळीत झाले. जिल्हय़ात दुसर्‍या दिवशीही बाश्रीटाकळी, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर या चार तालुक्यात अतवृष्टी झाली. नदी-नाल्यांना पूर आल्याने जिल्हय़ातील १४ गावांचा संपर्क तुटला असून, रामगाव ते मुजरे मोहंमदपूर येथील नाल्याच्या पुरात एक जण वाहून गेला.जिल्हय़ात गत रविवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. सोमवारी सकाळपर्यंंत जिल्हय़ातील पाच तालुक्यात अतवृष्टी झाली होती. मंगळवारीदेखील दिवसभर अधून-मधून पावसाने हजेरी लावली. गत २४ तासात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंंत जिल्हय़ात सरासरी ९३.७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्यामध्ये बाश्रीटाकळी, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर या चार तालुक्यात अतवृष्टी झाली. दरम्यान, संततधार पावसामुळे जिल्हय़ातील पूर्णा नदी आणि उपनद्या व नाल्यांना पूर आला. त्यामुळे संबंधित गावांचा मंगळवारी जिल्हय़ाशी संपर्क तुटला होता. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हय़ातील १४ गावांचा संपर्क तुटला असून, संबंधित गावांची रस्ते वाहतूक बंद होती. अतवृष्टी आणि पुरामुळे जिल्हय़ात विविध ठिकाणी घरांची पडझड झाल्याने नुकसान झाले. तर संततधार पावसामुळे जिल्हय़ातील धरणांच्या जलसाठय़ातही वाढ झाली. जिल्हय़ात अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने, संबंधित मार्गावरील वाहतूक ठप्प होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अकोला तालुक्यातील रामगाव ते मुजरेमोहंमदपूर नाल्याच्या पुरात मंगळवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास एक जण वाहून गेला. अतवृष्टी व पुरामुळे जिल्हय़ातील विविध भागात खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.गत दोन वर्षांंच्या दुष्काळी परिस्थितीनंतर जिल्हय़ात पावसाने दमदार हजेरी लावल्याने, शेतकरी सुखावला असला तरी, अतवृष्टी आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जिल्हय़ातील विविध भागात पिके पाण्याखाली आली आहेत. पेरलेली पिके उगवल्यानंतर शेतांमध्ये पाणी साचल्याच्या स्थितीत पिके धोक्यात आली. त्यामुळे दुष्काळी संकटानंतर जिल्हय़ातील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.