शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

१४ गावांचा संपर्क तुटला!

By admin | Updated: July 13, 2016 01:58 IST

अकोला जिल्हय़ातील चार तालुक्यात अतिवृष्टी: नाल्याच्या पुरात एक जण वाहून गेला.

अकोला: अतिवृष्टी आणि नदी-नाल्यांना पूर आल्याने जिल्हय़ात मंगळवारी जनजीवन विस्कळीत झाले. जिल्हय़ात दुसर्‍या दिवशीही बाश्रीटाकळी, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर या चार तालुक्यात अतवृष्टी झाली. नदी-नाल्यांना पूर आल्याने जिल्हय़ातील १४ गावांचा संपर्क तुटला असून, रामगाव ते मुजरे मोहंमदपूर येथील नाल्याच्या पुरात एक जण वाहून गेला.जिल्हय़ात गत रविवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. सोमवारी सकाळपर्यंंत जिल्हय़ातील पाच तालुक्यात अतवृष्टी झाली होती. मंगळवारीदेखील दिवसभर अधून-मधून पावसाने हजेरी लावली. गत २४ तासात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंंत जिल्हय़ात सरासरी ९३.७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्यामध्ये बाश्रीटाकळी, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर या चार तालुक्यात अतवृष्टी झाली. दरम्यान, संततधार पावसामुळे जिल्हय़ातील पूर्णा नदी आणि उपनद्या व नाल्यांना पूर आला. त्यामुळे संबंधित गावांचा मंगळवारी जिल्हय़ाशी संपर्क तुटला होता. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हय़ातील १४ गावांचा संपर्क तुटला असून, संबंधित गावांची रस्ते वाहतूक बंद होती. अतवृष्टी आणि पुरामुळे जिल्हय़ात विविध ठिकाणी घरांची पडझड झाल्याने नुकसान झाले. तर संततधार पावसामुळे जिल्हय़ातील धरणांच्या जलसाठय़ातही वाढ झाली. जिल्हय़ात अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने, संबंधित मार्गावरील वाहतूक ठप्प होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अकोला तालुक्यातील रामगाव ते मुजरेमोहंमदपूर नाल्याच्या पुरात मंगळवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास एक जण वाहून गेला. अतवृष्टी व पुरामुळे जिल्हय़ातील विविध भागात खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.गत दोन वर्षांंच्या दुष्काळी परिस्थितीनंतर जिल्हय़ात पावसाने दमदार हजेरी लावल्याने, शेतकरी सुखावला असला तरी, अतवृष्टी आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जिल्हय़ातील विविध भागात पिके पाण्याखाली आली आहेत. पेरलेली पिके उगवल्यानंतर शेतांमध्ये पाणी साचल्याच्या स्थितीत पिके धोक्यात आली. त्यामुळे दुष्काळी संकटानंतर जिल्हय़ातील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.