शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

विवाहितांच्या छळाचे दीड वर्षात १0७ गुन्हे!

By admin | Updated: July 7, 2014 00:40 IST

जिल्हय़ात विवाहिता, नवविवाहितांच्या छळाचे दरवर्षी सुमारे १५0 च्यावर गुन्हे दाखल होतात.

अकोला: जिल्हय़ात विवाहिता, नवविवाहितांच्या छळाचे दरवर्षी सुमारे १५0 च्यावर गुन्हे दाखल होतात. विवाहितेने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये पती, सासू, सासरे, दीर, नणंद आणि इतर नातेवाईकांची नावे दिली जातात आणि त्यानुसारच पोलिस या व्यक्तींना आरोपी बनवतात. बहुतांशवेळा कौटुंबिक कलहामध्ये पती, सासू, सासरे जबाबदार असतात; परंतु नणंद, तिचा पती व इतर नातेवाईकांचा काही दोष नसतानाही त्यांनाही आरोपी बनावे लागते. त्यामुळेच ४९८(अ) सारख्या गुन्हय़ामध्ये शिक्षेचे प्रमाणही अत्यल्प असल्याने या कलमाचा अनेकदा गैरवापर होतो, असे पोलिस अधिकारी, विधिज्ञांकडून बोलले जाते. हुंडाविरोधी कायद्याच्या गैरवापरावर तीव्र चिंता व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण चौकशी केल्याशिवाय सासरच्या मंडळींना अटक करू नये, असे आदेश पोलिसांना दिले आहेत. यावरूनच महिलांकडून अनेक प्रकरणांमध्ये भादंवि कलम ४९८(अ)(पती व सासरच्या मंडळीकडून शारीरिक व मानसिक छळ) या कलमाचा गैरवापर केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. यानिमित्ताने जिल्हय़ातील विवाहिता, नवविवाहितांच्या छळ प्रकरणांचा आढावा घेतला असता, गंभीर प्रकार पुढे आले. जिल्हय़ात २0१३ या वर्षामध्ये ७१ आणि जानेवारी ते जून २0१४ या सहा महिन्यांच्या कालावधीत ३६ गुन्हे दाखल झाले. महिला तक्रार देताना पती, सासू, सासरे यांच्यासह घरात उपस्थित नसणारे दीर, नणंद, दिरानी, नणंदचा पती यांचीही नावे देते. त्यानुसार पोलिस या महिलेच्या कौटुंबिक कलहाशी संबंध नसलेल्या लोकांविरुद्धसुद्धा गुन्हा दाखल करतात. या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. विधिज्ञांच्या मते, एकत्र कुटुंब नसल्याने छळ करणार तरी कोण? कुटुंबांमध्ये महिलेच्या छळाच्या घटना घडतात.