शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
4
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
5
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
6
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
7
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
8
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
9
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
10
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
11
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
12
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
13
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
14
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
15
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
16
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
17
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
18
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
19
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?

प्रक्रिया उद्योगातून महिलांनी सबलीकरण करावे - डॉ. मिलिंद अहिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:21 IST

राहुरी : प्रशिक्षणामध्ये घेतलेल्या ज्ञानाचा अवलंब करुन प्रक्रिया उद्योग सुरु करुन महिलांनी सबलीकरण करावे. अल्प शेतीवर प्रक्रिया उद्योग ...

राहुरी : प्रशिक्षणामध्ये घेतलेल्या ज्ञानाचा अवलंब करुन प्रक्रिया उद्योग सुरु करुन महिलांनी सबलीकरण करावे. अल्प शेतीवर प्रक्रिया उद्योग सुरु करुन देशापुढे आपले उदाहरण ठेवावे, असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हळगावचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांनी व्यक्त केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठात दोन दिवसीय महिला प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप नुकताच संपन्न झाला. यावेळी अहिरे बोलत होते. प्रशिक्षणास २५ महिला उपस्थित होत्या.

(अहिरे)

.................

महावितरणने वीजपुरवठा सुरळीत करावा

चांंदेकसारे : पोहेगाव परिसरात विजेचा खेळखंडोबा वीज वितरण कंपनीच्या कारभारामुळे परिसरातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यामध्ये वीज वितरण कंपनीने सुधारणा करावी, अशी मागणी ग्रामस्थ व्यापारी, शेतकऱ्यांकडून होत आहे. परिसरात कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. शेतकऱ्यांच्या मोटारी चालत नाही. त्यामुळे भरणे उरकत नाही. पाणी असूनही पिकांना देता येत नाही. कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने हाॅटेल व्यावसायिक वैतागले असून प्रचंड उष्णतेमुळे शीतपेये खराब होत आहेत. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे पीठगिरणीधारक वैतागले आहेत. वीज वितरण कंपनीने पूर्णदाबाने सुरळीत करावा अशी मागणी पोहेगाव परिसरातून होत आहे.

................

मानोरी ग्रामपंचायमध्ये शिवजयंती साजरी

वळण : राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली . त्याप्रसंगी सरपंच अब्बासभाई शेख , पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव, शामराव आढाव, अण्णासाहेब तोडमल, दिलावर पठाण, बाबासाहेब आढाव, बाबासाहेब मकासरे, नशीरभाई शेख उपस्थित होते.

.......................

वीज सबस्टेशन काम पूर्णत्वास

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील विद्युत सबस्टेशनवरील भार कमी करण्यासाठी नव्याने उभारलेल्या चिंचोली गुरव येथील ३३ केव्ही सबस्टेशनचे काम पूर्णत्वास आले आहे. या कामाची थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी पाहणी केली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा सुरळीत होणार आहे. याप्रसंगी उत्तर नगर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाषराव सांगळे, राजहंस ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष हौशीराम सोनवणे, माजी सभापती अविनाश सोनवणे सहित पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

........................

४ हजार कांदा गोण्यांची आवक

श्रीरामपूर : श्रीरामपूर बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये बुधवारी ४ हजार ३०० कांदा गोणीची आवक होती. सर्वाधिक भाव १२०० रुपये प्रतिक्विंटल प्रथम श्रेणीच्या कांद्यास मिळाला. प्रथम श्रेणीच्या कांद्यास ९०० ते १२००, द्वितीय ६०० ते ९००, तृतीय २५० ते ६०० व गोल्टी कांद्यास ५०० ते ८५० रुपये प्रतिक्विंटल विकला गेला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी परिपक्व कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन सभापती संगीता शिंदे व उपसभापती नितीन भागडे, सचिव किशोर काळे यांनी केले आहे.

-----............

टपाल सेवा विस्कळीत

पुणतांबा : राहाता तालुक्यातील पुणतांबा गावासाठी श्रीरामपूर, कोपरगाव आगाराने नियमित धावणाऱ्या एसटीच्या फेऱ्या कमी केल्याने पोस्टाच्या टपाल सेवा विस्कळीत झाली आहे. श्रीरामपूर आगार व कोपरगाव आगाराने बस फेऱ्या बंद केल्याने ग्रामीण भागात पोहाेचणारे टपाल सेवा विस्कळीत झाली आहे .श्रीरामपूर पोस्ट ऑफिसच्या अंतर्गत ४९ मोठे पोस्ट ऑफिस, २७५ ब्रांच पोस्ट ऑफिसांचा समावेश आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील टपाल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.