शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
3
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
4
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
5
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
6
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
7
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
8
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
9
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
10
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
11
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
12
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
13
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
14
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
15
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
16
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
17
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
18
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
19
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
Daily Top 2Weekly Top 5

विलसन चले जाव..??

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:24 IST

एक म्हणजे अकोले तालुक्याचे विभाजन, दुसरी म्हणजे आदिवासी-बिगरआदिवासी असा वाद लावू नका. पृथ्वीच्या जन्मापासूनचे सहजीवन आहे, त्याला धक्का लावू ...

एक म्हणजे अकोले तालुक्याचे विभाजन, दुसरी म्हणजे आदिवासी-बिगरआदिवासी असा वाद लावू नका. पृथ्वीच्या जन्मापासूनचे सहजीवन आहे, त्याला धक्का लावू नका. कोणीतरी बहुजन बहुजन म्हणतोय, तूप-रोटी खातोय. भाऊ! बहुजनात कोळी येत नाहीत, हे तू कोणत्या शब्दकोशात वाचले? त्यात काय बहुजन म्हणजे केवळ मराठा? दुसरा म्हणतो, शिवाजी राजांचे नाव फ्लेक्सवर नको? भाऊ! शिवाजी काय केवळ मराठ्यांचा राजा होता? नकाे असं बोलायला. तुम्ही हुशार आहात, आम्हा गरिबांची शपत आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भंडारदरा धरणाचे नामांतरण!

होय ! राघोजी भांगरे हे आदिवासींची अस्मिताच. त्या पवित्र अस्मितेचं राजकारण नको करायला. राघोजी अन्यायाविरुद्ध लढले. मला त्या वीराचा प्रचंड अभिमान आहे. शिवाजीराजांच्या बंडखोर वारसदारांपैकी एक राघोजी भांगरे. त्यावर मी पुस्तक लिहिलंय. त्या जाज्वल्य इतिहासाचा खेळ करायचे काम चालवलंय. राघोजी यांच्या विचारांचा प्रसार करायचे काम करताना कोणी कधीच दिसले नाहीत. तिकडे टोकियो - न्यूयॉर्कच्या, ठाण्याच्या रस्त्यांना नावे देता. यांनी आतापर्यंत स्वतःच्या गावात एखाद्या रस्त्याला का नाही दिले नाव? जुगार, दारू अड्डा चालवणाऱ्या अकोले स्टॅन्डकडे बोट करता? नका करू असं काही.

करायचे असेल तर एक करा, घटनेतील पाचव्या शेड्युलला सुरुंग लावण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे आदिवासींना मिळालेल्या मूलभूत हक्कांमध्ये मोठे बदल होत आहेत. तिकडे लक्ष द्या. अस्मितेच्या राजकारणाकडे नको.

विषयांतर होतंय....

मला मुख्य भंडारदरा धरणाबाबत काही म्हणायचंय. वेरूळ-अजिंठाच्या नामांतराचे आजपर्यंत जगात कोणाच्या मनात आले असे ऐकिवात नाही. तीच गोष्ट भंडारदरा धरणाची. तो केवळ एक पाणीसाठा नसून धरणाच्या जागेचे स्वर्गीय असे मूर्तिमंत उदाहरण आहे. ते एक नैसर्गिक शिल्पच आहे! पुरातन निसर्गाला पडलेले ते स्वप्न आहे! डोंगरदऱ्यातून त्यात झेपावलेले पाणी इतके विशुद्ध आहे, की कालपर्यंत कोणाची दृष्ट त्याला लागली नव्हती. काल ती लागली. दुर्दैव! नावात काय आहे? यावर अनेक चर्चा झडून गेल्यात. धरणाचे कागदोपत्री नाव विल्सन डॅम आहे. हे तरी किती लोकांना माहीत आहे? अन्य नाव दिले तरी तेच होईल कारण त्याच्या कपाळावर सटवीने भंडारदरा असेच लिहून ठेवले आहे. आज धरणाचे नाव बदलणार! उद्या डोंगरांची नावेही बदलणार! डोंगर कमी पडतील, तेव्हा पावसाला ही नावे दिली जातील. शेंडीवर पडणारा पाऊस... रेन फॉल, राजुरचा ....रेन फॉल, मग रतनगडाचे नामांतर ओघाने आलेच. हरिश्चंद्रगडाच्या नामांतरावरून तर महायुद्ध होईल..!

ताजमहालाला अन्य नाव देणे जितके हास्यास्पद तितकेच भंडारदऱ्याला. जेव्हा मूलभूत प्रश्नांचे मुद्दे संपतात, तेव्हा अशा अस्मितेचे राजकारण सुचते. सत्तरच्या दशकात भंडारदरा गंभीर आजारी पडला होता. तो उखडून फेकून चार-पाच वर्षात दुसरा उभा करणे सहज शक्य होते. पण तत्कालीन धुरीणांनी, द्रष्ट्यांनी तो असा काही दुरुस्त केला की त्याच्या मूळ ढाच्याला केसाइतकाही धक्का लागू नये. वा!! सलाम त्या पूर्वजांना! आणि आजचे हे धुरीण! गेल्या वीस वर्षात या भंडारदऱ्याची धूळधाण केली. अवकळा पसरली. अरे बाबांनो कोणी कालिदास तिथे येतो तर आणखी एक मेघदूत तिथे जन्मते! इतके ते सौंदर्य! ती सौंदर्य संपन्नता! शंभर वर्षांपूर्वी तो जन्मलाय. राहू द्या ना त्याला तसाच. कशाला छेडछाड करता त्याच्या नावाशी, का गावाशी! एक पुढारी मला तिरकसपणे म्हणाला, काय हो नामांतरण केल्याने पाण्याचा रंग बदलणार आहे काय? मी म्हणालो, इतके ही तुला समजत नसेल तर खुशाल कर. कळसुबाईला तुझ्या आजोबाचे नाव तर रंधा फॉलला तुझ्या पित्याचे नाव दे. या झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे कसे करायचे? खुशाल म्हणा, विल्सन चले जाव... त्याचे त्यांना लख लाभ होवो. इडा पीडा जावो आणि कळसुबाईचे राज्य येवो.!

- शांताराम गजे