शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

पाटबंधारे विभाग पिके नष्ट झाल्यानंतर पाणी देणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:19 IST

कोपरगाव : तालुक्यात सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी सुकून चालली आहेत. दोन-तीन ...

कोपरगाव : तालुक्यात सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी सुकून चालली आहेत. दोन-तीन दिवसांत गोदावरी कालव्याद्वारे पाणी मिळाले नाही, तर सर्वच पिके नष्ट होण्याची भीती आहे. असे असतानाही पाटबंधारे विभाग पिके जळून गेल्यावर पाणी देणार आहे का? असा सवाल जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी केला आहे.

गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने दारणा व गंगापूर धरणात चांगला पाणीसाठा शिल्लक आहे. गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्यांना किमान दोन आवर्तने देता येतील अशी परिस्थिती आहे. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात उसाबरोबरच खोडव्याचे पीक प्रचंड प्रमाणात आहे. चारा व भाजीपाला तसेच उन्हाळी रब्बी पिके सध्या शेतात उभी आहेत. विजेच्या सततच्या लपंडावामुळे वीज मोटारी बंद असल्याने पिकांना पाणी देता येत नाही. काही ठिकाणची पाणी पातळी खालावल्याने विहिरी व कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत. शेततळे, के. टी. वेअरमध्ये पाणी शिल्लक नाही. अशा अवस्थेत पिके जगविणे शेतकऱ्यांना कठीण होऊन बसले आहे. मागील वर्षातील पावसामुळे यंदाच्या रब्बी हंगामात सुमारे अडीच ते तीन टीएमसी पाण्याची बचत झालेली आहे. त्यामुळे धरणातील सध्याच्या पाणीसाठ्यातून गोदावरी कालव्याद्वारे दोन आवर्तने सहज देता येतील. मग पाटबंधारे विभाग पिके उद्ध्वस्त झाल्यावर आवर्तन सोडणार आहे का ? असा प्रश्न शेतकरीवर्गामधून विचारला जात आहे, असेही परजणे म्हणाले.