शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

पाटबंधारे विभाग पिके नष्ट झाल्यानंतर पाणी देणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:19 IST

कोपरगाव : तालुक्यात सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी सुकून चालली आहेत. दोन-तीन ...

कोपरगाव : तालुक्यात सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी सुकून चालली आहेत. दोन-तीन दिवसांत गोदावरी कालव्याद्वारे पाणी मिळाले नाही, तर सर्वच पिके नष्ट होण्याची भीती आहे. असे असतानाही पाटबंधारे विभाग पिके जळून गेल्यावर पाणी देणार आहे का? असा सवाल जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी केला आहे.

गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने दारणा व गंगापूर धरणात चांगला पाणीसाठा शिल्लक आहे. गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्यांना किमान दोन आवर्तने देता येतील अशी परिस्थिती आहे. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात उसाबरोबरच खोडव्याचे पीक प्रचंड प्रमाणात आहे. चारा व भाजीपाला तसेच उन्हाळी रब्बी पिके सध्या शेतात उभी आहेत. विजेच्या सततच्या लपंडावामुळे वीज मोटारी बंद असल्याने पिकांना पाणी देता येत नाही. काही ठिकाणची पाणी पातळी खालावल्याने विहिरी व कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत. शेततळे, के. टी. वेअरमध्ये पाणी शिल्लक नाही. अशा अवस्थेत पिके जगविणे शेतकऱ्यांना कठीण होऊन बसले आहे. मागील वर्षातील पावसामुळे यंदाच्या रब्बी हंगामात सुमारे अडीच ते तीन टीएमसी पाण्याची बचत झालेली आहे. त्यामुळे धरणातील सध्याच्या पाणीसाठ्यातून गोदावरी कालव्याद्वारे दोन आवर्तने सहज देता येतील. मग पाटबंधारे विभाग पिके उद्ध्वस्त झाल्यावर आवर्तन सोडणार आहे का ? असा प्रश्न शेतकरीवर्गामधून विचारला जात आहे, असेही परजणे म्हणाले.