शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात का वाढतोय कोरोना- २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:14 IST

----------- सध्या राज्यात राजकारण तापलेले आहे. सरकारचे अनेक घोटाळे बाहेर निघत आहेत. हे प्रकरण दाबण्यासाठी कोरोना वाढविण्याचे काम सुरू ...

-----------

सध्या राज्यात राजकारण तापलेले आहे. सरकारचे अनेक घोटाळे बाहेर निघत आहेत. हे प्रकरण दाबण्यासाठी कोरोना वाढविण्याचे काम सुरू आहे, असेच दिसते.

-शरद बोबडे, एकवीरा चौक

-----------

जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी केल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी अहवाल मिळतात. त्यामुळे संबंधित रुग्णास कोरोना आहे की नाही ते कळत नाही. तोपर्यंत तो सगळीकडे फिरत राहतो. चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तोपर्यंत तो शंभर-दोनशे लोकांना भेटून आलेला असतो. त्यामुळे एका दिवसात कोरोना चाचणीचा अहवाल मिळाला तर कोरोना वाढणार नाही.

-ॲड. अमित गाडेकर, अहमदनगर

------------

मास्क न लावणे हे कोरोना वाढण्याचे सगळ्यात मोठे कारण आहे. जरी काहींनी मास्क लावला तरी तो नाकाखाली लावतात, ज्याचा काहीच उपयोग होत नाही. होम क्वारंटाइन राहण्याला जास्त पसंती मिळत आहे. त्यामुळे घरातील इतर व्यक्तीही पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढत आहे. घरात सगळे नियम शिथिल असतात. सध्या लसीकरण सुरू आहे, ही एक चांगली बाब आहे. संपूर्ण भारतात लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे.

-हर्षल तांबोळी, बागरोजा हडको, नगर

--------------

राजकारणी लोकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी गरीब जनतेला रस्त्यावर आणण्यासाठी हे सगळे षडयंत्र रचल्याचे वाटत आहे. राज्यातील सरकार केवळ शंभर कोटींची वसुली करण्यासाठी काम करते आहे. कोरोनाचे कोणालाच देणे-घेणे नाही. कोरोना वाढला तर राजकारणी लोकांचे नव्हे तर सामान्य लोकांचेच जास्त हाल होणार आहेत. आधीच थोडेफार सावरलेले असताना पुन्हा कृत्रीिम कोरोना वाढवून राजकारण्यांना काय साध्य करायचे आहे, तेच समजत नाही. त्यामुळे कोरोनाचे खरे स्वरूप समजणे गरजेचे आहे.

-सुजय मोहिते, भूषणनगर, केडगाव

------------

लोक नियम पाळत नाहीत, हेच खरे कारण आहे. लोकांनी नियम हे स्वत:साठी पाळायचे आहेत, ते लोकांसाठी नव्हे. आपण नियम पाळले तर दुसरे सुरक्षित राहतील. खोकला, सर्दी, ताप आल्यास सगळीकडे न फिरता, लोकांच्या संपर्कात न जाता चाचणी व उपचार करण्यावर लोकांनी भर दिला तर कोरोना वाढणार नाही.

-डॉ. सागर बोरुडे, नागापूर

----------

कोरोनावरील लस सध्या उपलब्ध झाली आहे, त्यानंतर कोरोनाचे आकडे वाढत आहेत. लोकांना आता भीतीच्या छायेखाली जगणे आवडत नाही. त्यांना मुक्तपणे वावरणे आवडते. लोकांची हीच मानसिकता आता कोरोनाच्या वाढीसाठी कारणीभूत ठरली आहे.

-विशाल बोरुडे, बोरुडे मळा, नगर

----------

मास्क लावल्यानंतर दहा वेळा खाली-वर घेतला जातो. एका खासगी रुग्णालयात गेल्यावर तर तेथील स्टाफ मास्क वापरत नसल्याचे आढळून आले. कितीतरी दुकानदार मास्क लावत नाहीत, दुसरीकडे तेच सांगतात, लॉकडाऊन करू नका. दुकानदार मास्क लावत नाही म्हटल्यावर ग्राहकही मास्क लावत नाहीत. पेट्रोल पंपावरही ‘नो मास्क, नो पेट्रोल’ असे फलक लावलेले आहेत, मात्र नियम पाळताना कोणीच दिसत नाही.

-अभिषेक मेहेत्रे, कल्याण रोड, नगर

------------

नागरिक मास्कचा वापर करीत नाहीत. पोलीस दिसले तरच मास्क लावले जातात. सामाजिक अंतराचेही अनेक ठिकाणी पालन होत नाही. बाजार, भाजीबाजारात तर या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसते. कोरोना वाढण्यामागे हेच एकमेव कारण आहे.

-धनंजय सातपुते, सुनील गारुडकर, नगर

-------------

लोकांमध्ये आरोग्याबाबत निष्काळजीपणा पाहायला मिळतो. मास्क लावावा यासाठी दंड आकारावा लागतो, यापेक्षा दुर्दैव नाही. प्रत्येकाने नियम स्वत: पाळायचे आहेत. त्यासाठी प्रशासनाला रस्त्यावर उतरावे लागते, हे वाईट आहे. त्यामुळे प्रत्येकाने आत्मपरीक्षण केले तरी कोरोना का वाढतो आहे, याचे उत्तर मिळेल.

-अप्रतिम मुळे, नगर

----