शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

नगर जिल्ह्यात का वाढतोय कोरोना- २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:14 IST

----------- सध्या राज्यात राजकारण तापलेले आहे. सरकारचे अनेक घोटाळे बाहेर निघत आहेत. हे प्रकरण दाबण्यासाठी कोरोना वाढविण्याचे काम सुरू ...

-----------

सध्या राज्यात राजकारण तापलेले आहे. सरकारचे अनेक घोटाळे बाहेर निघत आहेत. हे प्रकरण दाबण्यासाठी कोरोना वाढविण्याचे काम सुरू आहे, असेच दिसते.

-शरद बोबडे, एकवीरा चौक

-----------

जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी केल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी अहवाल मिळतात. त्यामुळे संबंधित रुग्णास कोरोना आहे की नाही ते कळत नाही. तोपर्यंत तो सगळीकडे फिरत राहतो. चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तोपर्यंत तो शंभर-दोनशे लोकांना भेटून आलेला असतो. त्यामुळे एका दिवसात कोरोना चाचणीचा अहवाल मिळाला तर कोरोना वाढणार नाही.

-ॲड. अमित गाडेकर, अहमदनगर

------------

मास्क न लावणे हे कोरोना वाढण्याचे सगळ्यात मोठे कारण आहे. जरी काहींनी मास्क लावला तरी तो नाकाखाली लावतात, ज्याचा काहीच उपयोग होत नाही. होम क्वारंटाइन राहण्याला जास्त पसंती मिळत आहे. त्यामुळे घरातील इतर व्यक्तीही पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढत आहे. घरात सगळे नियम शिथिल असतात. सध्या लसीकरण सुरू आहे, ही एक चांगली बाब आहे. संपूर्ण भारतात लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे.

-हर्षल तांबोळी, बागरोजा हडको, नगर

--------------

राजकारणी लोकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी गरीब जनतेला रस्त्यावर आणण्यासाठी हे सगळे षडयंत्र रचल्याचे वाटत आहे. राज्यातील सरकार केवळ शंभर कोटींची वसुली करण्यासाठी काम करते आहे. कोरोनाचे कोणालाच देणे-घेणे नाही. कोरोना वाढला तर राजकारणी लोकांचे नव्हे तर सामान्य लोकांचेच जास्त हाल होणार आहेत. आधीच थोडेफार सावरलेले असताना पुन्हा कृत्रीिम कोरोना वाढवून राजकारण्यांना काय साध्य करायचे आहे, तेच समजत नाही. त्यामुळे कोरोनाचे खरे स्वरूप समजणे गरजेचे आहे.

-सुजय मोहिते, भूषणनगर, केडगाव

------------

लोक नियम पाळत नाहीत, हेच खरे कारण आहे. लोकांनी नियम हे स्वत:साठी पाळायचे आहेत, ते लोकांसाठी नव्हे. आपण नियम पाळले तर दुसरे सुरक्षित राहतील. खोकला, सर्दी, ताप आल्यास सगळीकडे न फिरता, लोकांच्या संपर्कात न जाता चाचणी व उपचार करण्यावर लोकांनी भर दिला तर कोरोना वाढणार नाही.

-डॉ. सागर बोरुडे, नागापूर

----------

कोरोनावरील लस सध्या उपलब्ध झाली आहे, त्यानंतर कोरोनाचे आकडे वाढत आहेत. लोकांना आता भीतीच्या छायेखाली जगणे आवडत नाही. त्यांना मुक्तपणे वावरणे आवडते. लोकांची हीच मानसिकता आता कोरोनाच्या वाढीसाठी कारणीभूत ठरली आहे.

-विशाल बोरुडे, बोरुडे मळा, नगर

----------

मास्क लावल्यानंतर दहा वेळा खाली-वर घेतला जातो. एका खासगी रुग्णालयात गेल्यावर तर तेथील स्टाफ मास्क वापरत नसल्याचे आढळून आले. कितीतरी दुकानदार मास्क लावत नाहीत, दुसरीकडे तेच सांगतात, लॉकडाऊन करू नका. दुकानदार मास्क लावत नाही म्हटल्यावर ग्राहकही मास्क लावत नाहीत. पेट्रोल पंपावरही ‘नो मास्क, नो पेट्रोल’ असे फलक लावलेले आहेत, मात्र नियम पाळताना कोणीच दिसत नाही.

-अभिषेक मेहेत्रे, कल्याण रोड, नगर

------------

नागरिक मास्कचा वापर करीत नाहीत. पोलीस दिसले तरच मास्क लावले जातात. सामाजिक अंतराचेही अनेक ठिकाणी पालन होत नाही. बाजार, भाजीबाजारात तर या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसते. कोरोना वाढण्यामागे हेच एकमेव कारण आहे.

-धनंजय सातपुते, सुनील गारुडकर, नगर

-------------

लोकांमध्ये आरोग्याबाबत निष्काळजीपणा पाहायला मिळतो. मास्क लावावा यासाठी दंड आकारावा लागतो, यापेक्षा दुर्दैव नाही. प्रत्येकाने नियम स्वत: पाळायचे आहेत. त्यासाठी प्रशासनाला रस्त्यावर उतरावे लागते, हे वाईट आहे. त्यामुळे प्रत्येकाने आत्मपरीक्षण केले तरी कोरोना का वाढतो आहे, याचे उत्तर मिळेल.

-अप्रतिम मुळे, नगर

----