शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरच्या बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : जुलै महिन्यात संगमनेर, श्रीरामपूर आणि शेवगाव येथील वाहतूक शाखा बरखास्त करण्यात आल्या. अनेक ठिकाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

संगमनेर : जुलै महिन्यात संगमनेर, श्रीरामपूर आणि शेवगाव येथील वाहतूक शाखा बरखास्त करण्यात आल्या. अनेक ठिकाणी वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. संगमनेरातदेखील वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असून शहरात अनेक ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होते आहे. त्यामुळे संगमनेरच्या बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावणार कोण, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्याजवळ तीन वर्षांपूर्वी संगमनेर वाहतूक शाखेचे कार्यालय सुरू करण्यात आले होते. स्वतंत्र वाहतूक शाखेची निर्मिती झाल्यानंतर संगमनेरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागेल, वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई होईल तसेच शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल, अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा होती. वाहतूक शाखेचा पदभार असलेले तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक गोपाळ उंबरकर तसेच पी.वाय. कादरी यांनी बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची बदली झाली.

तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी संगमनेर, श्रीरामपूर आणि शेवगाव येथील जिल्हा वाहतूक नावाने स्वतंत्र शाखा सुरू केेल्या होत्या. वाहतूक शाखा बरखास्त झाल्यानंतर वाहतूक पोलिसांना पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. संगमनेर तालुका विस्ताराने मोठा आहे. पुणे, नाशिक, मुंबई या बड्या शहरांच्या मध्यावर संगमनेर असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. रुग्णालये, बॅँका, पतसंस्था, खासगी व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, अनेक शिक्षण संस्था, हॉटेल्स यासह विविध उद्योग, व्यवसाय संगमनेरात मोठ्या प्रमाणात असून त्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे संगमनेरात कायमच गर्दी असते. शहराच्या लगतचा परिसर वाढतो आहे.

शहरात मेन रोड, बाजारपेठ, नवीन नगर रोड, बसस्थानक परिसर, दिल्ली नाका, अकोले नाका, मोमीनपुरा, जाणता राजा मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अशोक चौक, तहसील कार्यालय परिसर, सावरकर मार्ग (लिंक रोड), विद्यानगर, मालदाड रोड, नेहरू चौक, तीनबत्ती चौक आदी ठिकाणी विविध प्रकारची वाहने चुकीच्या पद्धतीने उभी केल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो आहे. रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहतूक पोलिसांची संख्या कमी झाल्याने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचे प्रमाणही कमी झाले आहे.

---------------

वाहनांचे कर्णकर्कश्श आवाज

अनेक दुचाकी वाहनचालकांनी त्यांच्या वाहनांचे सायलेन्सर, हॉर्नमध्ये बदल केला असून कर्णकर्कश्श आवाजाचा नागरिकांना त्रास होतो. अनेक जण रस्त्यांवर दुचाकी वाहनांचे स्टंट करतात, अशांविरुद्ध कुठलीही कारवाई होताना दिसत नाही.

----------

सिग्नल व्यवस्था सुरू होण्यापूर्वीच बंद

संगमनेर नगर परिषदेने वाहनतळासंदर्भात अद्याप कुठलेही धोरण ठरविलेले नाही. त्यामुळे जागा मिळेल तेथे वाहनचालक आपली वाहने उभी करतात. सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली सिग्नल व्यवस्था सुरू होण्यापूर्वीच बंद पडली. त्यावरील दिवेदेखील गायब आहेत.

फोटो नेम : ०४ बसस्थानकासमोर झालेली वाहतूककोंडी.