शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

चौपदरी रस्ता करण्याचा अट्टहास कुणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:16 IST

याबाबत अवसक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, संगमनेर शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावर होणारी कोंडी सोडविण्यासाठी शहराच्या बाहेरून नाशिक-पुणे ...

याबाबत अवसक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, संगमनेर शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावर होणारी कोंडी सोडविण्यासाठी शहराच्या बाहेरून नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्ग करण्यात आला. त्यामुळे शहरात होणारी वाहतुकीची समस्या बऱ्यापैकी कमी झाली आहे. १३२ के.व्ही.पासून अकोलेकडे जाण्यासाठी बाह्यवळण रस्ता आहे. तसेच अहमदनगरकडे जाणारी अवजड वाहने बाहेरच्या मार्गाने वळविण्यात येतात. त्यामुळे अवजड वाहने शहरातून जाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा खूपच कमी झाले आहे.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयापासून ते संगमनेर खुर्दपर्यंत नऊ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी २४ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. चौपदरीकरण करताना रस्त्याचे रुंदीकरण प्रस्तावित आहे. त्यानुसार मोजणी करत खुणा करण्यात आल्या आहेत. हा रस्ता शहरातून जात असल्याने परिसरात काहींची घरे असून अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची दुकाने आहेत. कोरोनामुळे गेल्या एक-दीड वर्षांपासून परिस्थिती बिकट बनली असताना त्यांचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला आहे.

रुंदीकरणात घरे, दुकानांवर खुणा केल्या असल्याने आधीच कोरोनाच्या भीतीत जगत असलेले नागरिक आता काळजीत पडले आहेत. वहिवाटीनुसार स्वमालकीच्या जागेवर पक्के बांधकाम केलेल्या नागरिकांवर अन्याय होणार आहे. शहरातून चौपदरी रस्ता करण्याचा घेतलेला निर्णय हा तुघलकी असून त्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर पडतील, अशीही नागरिकांमध्ये भीती आहे. अनेक संस्था, आस्थापना यांचेही नुकसान होणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा स्थानिक लोकप्रतिनिधींनी विचार करावा, असेही म्हटले आहे.

---------

माहिती देण्यास असमर्थता

संगमनेर शहरातून जाणाऱ्या जुन्या नाशिक-पुणे महामार्गाच्या चौपदीकरणासह सुशोभिकरणासाठी २४ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या संदर्भाने अधिक माहितीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील यांच्यांशी मोबाइलद्वारे संपर्क केला असता, त्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. माहिती अधिकार कायद्याचा वापर करत याबाबत माहिती घ्यावी, असे त्यांनी सुचविले.

------------