शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
2
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
3
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
4
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
5
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
6
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
7
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
8
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
9
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
10
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
11
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
12
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
13
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
14
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
15
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
16
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
17
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
18
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

जिल्ह्यात नववीतील दीड हजार विद्यार्थी गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:15 IST

अहमदनगर : नववीतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केलेले विद्यार्थी यांच्यात तब्बल दीड हजार विद्यार्थ्यांची तफावत आढळत ...

अहमदनगर : नववीतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केलेले विद्यार्थी यांच्यात तब्बल दीड हजार विद्यार्थ्यांची तफावत आढळत असल्याने नववीतील हे विद्यार्थी गेलेे कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांनी नववीतून शाळा सोडली की त्यांचे परजिल्ह्यात स्थलांतर झाले याची माहिती समोर आलेली नाही.

यू-डायसच्या माहितीनुसार नगर जिल्ह्यात २०१९-२० या शैक्षणिक वर्षात ८१ हजार २०० विद्यार्थी नववीत होते. शासन निर्देशानुसार पहिली ते नववीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले जात नाही. त्यामुळे हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण गृहीत धरले जातात. यातून सीबीएसई बोर्डाचे ६ हजार ४९१ विद्यार्थी वजा केले तरी उर्वरित ७४ हजार ७०९ विद्यार्थी दहावी वर्गात जाणे अपेक्षित होते; परंतु पुढील शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये नगर जिल्ह्यातून ७३ हजार १३९ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केलेला होता. म्हणजे यात १५७० विद्यार्थ्यांची तफावत आढळून येते. त्यामुळे नववीतून दहावीत न आलेले हे विद्यार्थी गेले कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांनी नववीतूनच शाळा सोडली का, ते इतर जिल्ह्यांत स्थलांतर झाले का, किंवा त्याला आणखी काही कारणे आहेत, याची माहिती समोर आलेली नाही.

-----------

जिल्ह्यात नववी पास विद्यार्थी - ७४७०९

दहावीसाठी अर्ज केलेले विद्यार्थी - ७३१३९

---------------

पटसंख्येचा घोळ

नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला नापास केले जात नाही. त्यामुळे पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी मधल्या काळात शाळाबाह्य झाला तरी पटसंख्येसाठी तसे दाखिवले जात नाही. तो रेकाॅर्डवरच असतो; परंतु दहावीसाठी अर्ज करताना हा विद्यार्थी प्रत्यक्षात नसतोच. अशीही काही उदाहरणे आहेत. परिणामी दहावीत विद्यार्थिसंख्या आपसूकच कमी भरते, असेही काही शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

-------------

शासनाच्या निर्देशानुसार पहिलीपासून नववीपर्यंत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण केले जातात; परंतु दहावीत अभ्यास करूनच उत्तीर्ण व्हावे लागते. काही विद्यार्थ्यांची पुरेशी तयारी न झाल्याने ते दहावीचा परीक्षा अर्ज भरत नाहीत. काही मुलींचे विवाह होतात, काही इतर जिल्ह्यांत जातात किंवा कामगारांच्या मुलांचे स्थलांतर होते. या कारणांमुळे दहावीत हे विद्यार्थी कमी दिसतात.

- प्राचार्य सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक संघ

-------

नववीतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केलेले विद्यार्थी यांच्यात काही प्रमाणात तफावत आहे. त्याची काय कारणे आहेत, याचा शोध घेतला जाईल.

- रामदास हराळ, शिक्षणाधिकारी, माध्यमिक