शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

आचारसंहिता लागताच प्रशासन कठोर

By admin | Updated: March 18, 2024 18:01 IST

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारपासून लागू झाली आहे़ जिल्हा प्रशासनाकडून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारपासून लागू झाली आहे़ जिल्हा प्रशासनाकडून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत़ तसेच राजकीय पक्षांनी जाहिरात फलक, भिंतीपत्रके आणि चिन्हे लावली असतील तर ती काढून टाकण्याची व्यवस्था करावी, अन्यथा आचारसंहितेचा भंग केल्याबाबत संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला़केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ ची घोषणा केली आहे़ राज्यात एकाच टप्प्यात येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेतले जाणार आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कवडे बोलत होते़ जिल्ह्यात १२ मतदारसंघ आहेत़ जिल्हा निवडणूक शाखेकडून निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे़ कर्मचाऱ्यांना निवडणुकीबाबतचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे़ प्रत्येक मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर दहा समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे़ निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया मतदारसंघातच पूर्ण होईल़ जिल्ह्यात १२ मतदारसंघासाठी ३ हजार ५९३ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे़ मतदान केंद्रांत लोकसभा निवडणुकीप्रमाणे मतदान यंत्र असतील़ मात्र नगर शहर मतदारसंघात ‘व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट ट्रायल’ हे मशीन जोडले जाईल़ त्यामुळे आपण कोणत्या उमेदवाराला मतदान केले, याची खात्री करता येणार आहे़ ही व्यवस्था केवळ शहर मतदारसंघातील मतदान केंद्रांवरच असणार आहे़ इतर मतदान केंद्रावर ही व्यवस्था असणार नाही, असे कवडे यांनी यावेळी सांगितले़विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ३२ लाख ४ हजार ३५३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत़ अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात येईल़ मतदान नोंदणीची प्रक्रिया उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापर्यंत सुरू राहील़ ज्या मतदारांचे मतदारयादीत नाव असेल, त्याच मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे़ केवळ ओळखपत्र असून, चालणार नाही़ मतदारांना त्यांच्या घरीच मतदानासाठीची चिठ्ठी मिळेल़ तसेच मतदान केंद्राबाहेरदेखील चिठ्ठी देण्याची व्यवस्था केली जाईल़ प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांवर नियुक्तीच्या ठिकाणी हजर होणे बंधनकारक असणार आहे,असे कवडे म्हणाले़ (प्रतिनिधी)