शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता लागताच प्रशासन कठोर

By admin | Updated: March 18, 2024 18:01 IST

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारपासून लागू झाली आहे़ जिल्हा प्रशासनाकडून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारपासून लागू झाली आहे़ जिल्हा प्रशासनाकडून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत़ तसेच राजकीय पक्षांनी जाहिरात फलक, भिंतीपत्रके आणि चिन्हे लावली असतील तर ती काढून टाकण्याची व्यवस्था करावी, अन्यथा आचारसंहितेचा भंग केल्याबाबत संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला़केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ ची घोषणा केली आहे़ राज्यात एकाच टप्प्यात येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेतले जाणार आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कवडे बोलत होते़ जिल्ह्यात १२ मतदारसंघ आहेत़ जिल्हा निवडणूक शाखेकडून निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे़ कर्मचाऱ्यांना निवडणुकीबाबतचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे़ प्रत्येक मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर दहा समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे़ निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया मतदारसंघातच पूर्ण होईल़ जिल्ह्यात १२ मतदारसंघासाठी ३ हजार ५९३ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे़ मतदान केंद्रांत लोकसभा निवडणुकीप्रमाणे मतदान यंत्र असतील़ मात्र नगर शहर मतदारसंघात ‘व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट ट्रायल’ हे मशीन जोडले जाईल़ त्यामुळे आपण कोणत्या उमेदवाराला मतदान केले, याची खात्री करता येणार आहे़ ही व्यवस्था केवळ शहर मतदारसंघातील मतदान केंद्रांवरच असणार आहे़ इतर मतदान केंद्रावर ही व्यवस्था असणार नाही, असे कवडे यांनी यावेळी सांगितले़विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ३२ लाख ४ हजार ३५३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत़ अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात येईल़ मतदान नोंदणीची प्रक्रिया उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापर्यंत सुरू राहील़ ज्या मतदारांचे मतदारयादीत नाव असेल, त्याच मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे़ केवळ ओळखपत्र असून, चालणार नाही़ मतदारांना त्यांच्या घरीच मतदानासाठीची चिठ्ठी मिळेल़ तसेच मतदान केंद्राबाहेरदेखील चिठ्ठी देण्याची व्यवस्था केली जाईल़ प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांवर नियुक्तीच्या ठिकाणी हजर होणे बंधनकारक असणार आहे,असे कवडे म्हणाले़ (प्रतिनिधी)