शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

आचारसंहिता लागताच प्रशासन कठोर

By admin | Updated: March 18, 2024 18:01 IST

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारपासून लागू झाली आहे़ जिल्हा प्रशासनाकडून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारपासून लागू झाली आहे़ जिल्हा प्रशासनाकडून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत़ तसेच राजकीय पक्षांनी जाहिरात फलक, भिंतीपत्रके आणि चिन्हे लावली असतील तर ती काढून टाकण्याची व्यवस्था करावी, अन्यथा आचारसंहितेचा भंग केल्याबाबत संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला़केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ ची घोषणा केली आहे़ राज्यात एकाच टप्प्यात येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेतले जाणार आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कवडे बोलत होते़ जिल्ह्यात १२ मतदारसंघ आहेत़ जिल्हा निवडणूक शाखेकडून निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे़ कर्मचाऱ्यांना निवडणुकीबाबतचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे़ प्रत्येक मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर दहा समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे़ निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया मतदारसंघातच पूर्ण होईल़ जिल्ह्यात १२ मतदारसंघासाठी ३ हजार ५९३ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे़ मतदान केंद्रांत लोकसभा निवडणुकीप्रमाणे मतदान यंत्र असतील़ मात्र नगर शहर मतदारसंघात ‘व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट ट्रायल’ हे मशीन जोडले जाईल़ त्यामुळे आपण कोणत्या उमेदवाराला मतदान केले, याची खात्री करता येणार आहे़ ही व्यवस्था केवळ शहर मतदारसंघातील मतदान केंद्रांवरच असणार आहे़ इतर मतदान केंद्रावर ही व्यवस्था असणार नाही, असे कवडे यांनी यावेळी सांगितले़विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ३२ लाख ४ हजार ३५३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत़ अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात येईल़ मतदान नोंदणीची प्रक्रिया उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापर्यंत सुरू राहील़ ज्या मतदारांचे मतदारयादीत नाव असेल, त्याच मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे़ केवळ ओळखपत्र असून, चालणार नाही़ मतदारांना त्यांच्या घरीच मतदानासाठीची चिठ्ठी मिळेल़ तसेच मतदान केंद्राबाहेरदेखील चिठ्ठी देण्याची व्यवस्था केली जाईल़ प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांवर नियुक्तीच्या ठिकाणी हजर होणे बंधनकारक असणार आहे,असे कवडे म्हणाले़ (प्रतिनिधी)