शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

जमिनीत तण वाढलेय, मग मीठ फवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:19 IST

अहमदनगर : पावसाळ्यात, हिवाळ्यात जमिनीत मोठ्या प्रमाणात तण वाढते. या तणाचा नाश करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. त्यासाठी ...

अहमदनगर : पावसाळ्यात, हिवाळ्यात जमिनीत मोठ्या प्रमाणात तण वाढते. या तणाचा नाश करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी तणावर मिठाची फवारणी करावी. यामुळे चार ते सहा दिवसांत तणाचा नाश होईल, असा सल्ला मीठ शेतीचे अभ्यासक सबाजीराव गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.

सबाजीराव गायकवाड हे गेल्या १६ वर्षांपासून आपल्या शेतातील पिकांवर मिठाचे विविध प्रयोग राबवितात. त्यांनी मिठापासून विविध संशोधन पुढे आणले आहे. त्यांनी आतापर्यंत तीस हजार शेतकऱ्यांनादेखील मीठ शेतीविषयक मोफत मार्गदर्शन केले आहे. ऊस, ज्वारी, बाजरी, कांदा, विविध प्रकारच्या फळझाडांसाठी मिठाचे काय फायदे होतात, याचा सल्लाही शेतकऱ्यांना ते कायम देत असतात.

शेतातील तणाविषयी गायकवाड यांनी सांगितले की, जमिनीत तण वाढल्यानंतर मोकळ्या जमिनीत फवारणीचे प्रमाण १५ लिटर पाणी घेऊन त्यात दोन किलो खडेमीठ विरघळावे. ते मिठाचे पाणी एका स्प्रे पंपात भरावे. ते पाणी तणावर तण भिजेपर्यंत फवारावे. ४ ते ५ दिवसांत तण खाक होऊन जाते. यामुळे खर्चातदेखील बचत होते. मिठाचा केवळ तणांचा नाश करण्यासाठी उपयोग नाही, तर पिकांवर कीटकनाशक म्हणूनदेखील वापर करता येतो. पिकांची पेरणी किंवा कांदा लागवड, फळबाग यातील तणांचा नायनाट करण्यासाठी मिठाचा वापर करावा. मिठाचा प्रमाणशीर व वेळेवर वापर केला, तर कोणतेही पीक रोगाला बळी पडत नाही, असेही त्यांनी सांगितले.

....

क्षारपड जमिनीचा ८.५ पीएच असेल तर मिठाचा वापर करून सहा महिन्यांत जमिनीचा ७ पीएच होतो, हे मी शेतकऱ्यांना सिद्ध करून दाखविले आहे; परंतु हे सर्व करताना कोणत्या पिकाला किती मीठ वापरायचे, कसे वापरायचे, किती वेळा वापरायचे, याचे प्रमाण ठरले आहे. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांंना कृषी विकास प्रतिष्ठानमार्फत मोफत मार्गदर्शन करतो.

-सबाजी गायकवाड, कृषी अभ्यासक, वाळूंज, ता. अहमदनगर.