शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

अवघड क्षेत्रातील शाळा निश्चितीसाठी बुधवारी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:33 IST

गेल्यावर्षी कोरोनामुळे शिक्षकांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे यंदाही बदल्यांबाबत ग्रामविकास विभाग काय निर्णय घेणार याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. ...

गेल्यावर्षी कोरोनामुळे शिक्षकांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे यंदाही बदल्यांबाबत ग्रामविकास विभाग काय निर्णय घेणार याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बदल्या होऊ अथवा न होऊ जिल्हा परिषदेकडून त्याबाबतची तयारी करण्यात येत आहे. बदल्यांच्या प्रक्रियेतील एक भाग म्हणून अवघड शाळांची निश्‍चिती करण्यात येत आहे.

७ एप्रिल २०२१ शासन निर्णयानुसार शिक्षकांच्या बदल्याचे अधिकार पुन्हा जिल्हा परिषद सीईंओकडे देण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या राज्य पातळीवरून ऑनलाईन होत आहेत. बदली पात्र शिक्षकांनी ऑनलाईन भरून दिलेल्या माहितीच्या आधारे एकाच वेळी राज्यातील सर्व शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया होते. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणारी समिती जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा निश्‍चित करते. या समितीत उपजिल्हाधिकारी (निवडणूक विभाग), कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग), कार्यकारी अभियंता (जिल्हा परिषद बांधकाम विभाग), विभाग नियंत्रक (राज्य परिवहन मंडळ) आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे सदस्य आहेत. ही समिती जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा निश्‍चित करणार आहे.

अवघड क्षेत्रातील शाळा ठरविताना काही निकष ठरवून दिलेले आहेत. त्यानुसार संबंधित शाळा ही नक्षलग्रस्त अथवा पेसा क्षेत्रात असणाऱ्या गावातील असावी, वार्षिक सरासरी पर्जन्यमान २ हजार पेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने संपर्क तुटणारे गाव असावे (महसूल विभागाच्या माहितीनुसार), वन्यप्राण्याचा उपद्रव असणारा जंगलव्याप्त प्रदेश असावा (संबंधित उप वनसंरक्षक यांच्या अहवालानुसार), वाहतूक सुविधांचा अभाव किंवा चांगल्या रस्त्यांनी न जोडलेल्या शाळा, (बस, रेल्वे अथवा अन्य सार्वजनिक वाहतूक सुविधा नसणे), संवाद छायेचा प्रदेश (बीएसएनएलच्या महाप्रबंधक यांचा अहवालानुसार), डोंगरी भाग प्रदेश (नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार), राष्ट्रीय महामार्गापासून १० किलोमीटरपेक्षा जादा दूर असणारी गावातील प्राथमिक शाळा या अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करण्यात येणार आहेत. दर तीन वर्षांनी याचे अवलोकन करण्याचे ग्रामविकास विभागाचे आदेश आहेत. सरकारने ठरवून दिलेल्या सात निकषांपैकी कोणत्याही तीन निकषांत बसणाऱ्या प्राथमिक शाळा या अवघड शाळा होणार आहेत. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी या समितीतील सदस्यांची बैठक घेणार आहेत.