शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कोरोनाकाळात जिल्ह्यात बालविवाहाची लाट

By | Updated: December 5, 2020 04:35 IST

तुळशी विवाह झाल्यानंतर सर्वत्र लग्नाच्या तारखा निघतात. त्यामुळे येणाऱ्या काळातही बालविवाह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यातील ...

तुळशी विवाह झाल्यानंतर सर्वत्र लग्नाच्या तारखा निघतात. त्यामुळे येणाऱ्या काळातही बालविवाह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बालसेवी संस्थेचे कार्यकर्ते एकत्र आले असून जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प या सर्वांनी केला आहे. या उपक्रमात बालकल्याण समितीसह चाईल्ड लाईन, स्नेहालय संचालित उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान, बाल संरक्षण कक्ष यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हा बालसंरक्षण कक्ष यांच्या माध्यमातून सर्व ग्रामीण व शहरी भागात बालसंरक्षण समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समित्यांना बालहक्कांची जपणूक व बालविवाह प्रतिबंध कायदा- २००६ चे विशेष प्रशिक्षण देऊन जनजागृती करण्यासाठी नियोजन केले असल्याचे शेख यांनी सांगितले.

कोरोनाकाळात थांबविले ७२ बालविवाह

"बालकल्याण समिती व चाइल्ड लाईन संस्थेने कोरोनाकाळात ७२ बालविवाह थांबविले आहेत. यात एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत. अनेक ठिकाणी बालविवाह झाले. मात्र, या घटना समोर आलेल्या नाहीत.

वयाची खात्री करूनच विवाहात सहभागी व्हावे

बालविवाहास प्रतिबंध करण्यासाठी गावपातळीवर ग्रामसेवक तर शहरात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना ‘बालविवाह प्रतिबंध अधिकारी’ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. बालविवाह झाल्यास संबंधित पालक, वऱ्हाडी, लग्नपत्रिका छापणारे, प्रिंटिंग प्रेसचे मालक, विवाह विधी करणारे मंगल कार्यालय मालक, बॅंडपथक, केटरिंग, मंडप डेकोरेशन या व्यावसायिकांवरही गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे मुलाचे वय २१, तर मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असल्याची खात्री संबंधितांनी करावी. तसेच प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिला, मुलींच्या वयाचा पुरावा घेऊन त्याचा अहवाल सरकारी व खासगी रुग्णालयांनी सादर करावा, असे आवाहन बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख यांनी केले आहे.