शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडेची पाणीपातळी ६१० मीटरवर स्थिर ठेवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:24 IST

निळवंडे धरणातील पाण्याची पातळी नेहमी किमान ६१० मीटर असणे आवश्यक आहे. मात्र यंदा अधिक प्रमाणात पाणी सोडल्यामुळे निळवंंडे ...

निळवंडे धरणातील पाण्याची पातळी नेहमी किमान ६१० मीटर असणे आवश्यक आहे. मात्र यंदा अधिक प्रमाणात पाणी सोडल्यामुळे निळवंंडे धरणाच्या पाण्याची पातळी ६१० मीटरपेक्षा कमी झाली. त्यामुळे आदिवासी भागातील अनेक गावांतील उपसा जलसिंचन योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न तयार झाला असल्याने निळवंडे धरणातील पाण्याची पातळी वाढविणे गरजेचे आहे.

निळवंडे धरणाच्या पाण्याची पातळी कमी ठेवल्याने

राजूर-केळुंगण-कोहकडी, पिंपरकणे-शेलविहीरे व पिंपळगाव नाकविंदा या तीन उपसा जलसिंचन योजना बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे मोहोंडूळवाडी, माळेगाव, कातळापूर, कोदणी, रणद बु, लाडगाव, टिटवी, शेणित, मान्हेरे, अंबेवंगण या सर्व गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. राजूर हे गाव १५ हजारांपेक्षा जास्त लोकवस्तीचे आहे व इतर गावे हे ३ हजार पेक्षा जास्त लोकवस्तीचे आहेत. तरी शासनाने धरणाच्या पाण्याची ६१० मीटर करावी, अन्यथा येथील सर्व गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर जलसंपदा विभागाकडून उपलब्ध करून देणे संदर्भात कार्यवाही करणे अत्यंत गरजेचे आहे.

तसेच राजूर- केळुंगण-कोहंडी, पिंपरकणे-शेलविहीरे व पिंपळगाव नाकविंदा या तीनही उपसा जलसिंचन योजनेचे पाणीपट्टीचे बिल शेतकऱ्यांकडून वसूल केले जाते. मात्र पाण्याचे नियोजन न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येते. पाण्याअभावी झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी व आदिवासी भागातील जनतेला पिण्याचे पाणी त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी पिचड यांनी जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.