शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गोदावरी खोऱ्यात पाणी वळविण्याचे काम प्रगतिपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:57 IST

भेंडा : सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पावसाचे समुद्रात जाणारे पाणी पश्चिम वाहिनी नद्यांतून पूर्वेकडील गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी ३० प्रवाही वळण योजना ...

भेंडा : सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पावसाचे समुद्रात जाणारे पाणी पश्चिम वाहिनी नद्यांतून पूर्वेकडील गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी ३० प्रवाही वळण योजना व दोन नद्या जोड प्रकल्पातून १९.१८ द.ल.घ.मी (टीएमसी) पाणी देण्याची महत्त्वपूर्ण योजना प्रगतिपथावर असल्याचे पत्र लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या सहाय्यक अधीक्षक अभियंत्यांनी नेवासा तालुका भारतीय जनसंसदेला पाठविले आहे.

नेवासा तालुका भारतीय जनसंसदचे अध्यक्ष रामराव भदगले, ॲड. विठ्ठलराव जंगले, डाॅ. अशोक ढगे, कारभारी गरड यांनी या महत्त्वाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री, राज्य शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार, आंदोलन करून पाठपुरावा केला होता. त्यामुळे योजनेची सद्य:स्थिती सविस्तर कळविली आहे. ३० प्रवाही वळण योजनेपैकी १२ योजना पूर्ण झाल्या आहेत. ७ प्रवाही योजना प्रगतिपथावर आहेत. भविष्यकालीन ११ प्रवाही योजनांपैकी काहींचे सर्वेक्षण झाले असून अंदाजपत्रक डिसेंबर २०२० अखेर सादर केले आहे. त्यातील निविदा प्रक्रिया प्रगतिपथावर आहेत. काही योजनांचे सर्वेक्षण निविदा प्रगतिपथावर आहेत.

पूर्ण झालेल्या १२ प्रवाही योजना- रानपाडा, चाफ्याचा पाडा, हट्टीपाडा, पळसविहीर, चिल्लरपाडा, गोळशी, झालापाडा, आंबेगण संकुल, पिंपरज, अंबोली बोंबिलटेक, वाघेरा, वळुंजे. प्रगतिपथावरील ७ प्रवाही वळण योजना- मांजरपाडा, धोंडाळपाडा, ननाशी, पायरपाडा, गोळशी महाजे, पँगलवाडी, वैतरणा सॅडल. भविष्यकालीन ११ प्रवाही वळण योजना- अंबाड, चिमणपाडा, कळमुस्ते, अंबोली वेळुजे, कापवाडी, हिवरा, साभद, तोलारखिंड, खिरेश्वर, सादडापाट, पाथरपाट.

राज्यांतर्गत नदीजोड योजनेच्या दोन प्रवाही वळण योजना : दमणगंगा- एकदरे - गोदावरी आणि दमणगंगा. वैतरणा- कडवा - गोदावरी. या दोन योजनेचे १२.१८ टीएमसी पाणी दमणगंगा, वैतरणा खोऱ्यातून वाघाड धरण व उर्ध्व वैतरणा धरणात येणार आहे. यांचे सर्वेक्षण व अन्वेषण अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता असून हे काम राष्ट्रीय जलविकास अभिकरणामार्फत प्रगतिपथावर आहे.

-----

मुळा, भंडारदऱ्यात वळविणार पाणी..

दमणगंगा, पार, वैतरणा व उल्हास या ४ पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडील गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. भंडारदरा, मुळा धरणात हे पाणी येणार आहे. यामुळे नगर जिल्ह्यासह औरंगाबाद, बीड, नांदेड आदी जिल्ह्यातील शेतीसिंचन, पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.