शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
4
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
5
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
6
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
7
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
8
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
9
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
10
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
11
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
12
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
13
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
14
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
15
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
16
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
17
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
18
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
19
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
20
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?

श्रीरामपुरात पाणी कपात

By admin | Updated: June 28, 2014 01:11 IST

श्रीरामपूर: जलसंपदा विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसून श्रीरामपूर तालुक्यात पाणी टंचाई सुरू झाली आहे.

श्रीरामपूर: जलसंपदा विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसून श्रीरामपूर तालुक्यात पाणी टंचाई सुरू झाली आहे.निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडले होते. पण जलसंपदा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे तसेच कालवा सल्लागार समितीच्या नियंत्रणाअभावी हे पाणी वरच्याच भागात गायब झाले. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सचिन गुजर यांनी केली आहे. श्रीरामपूर नगरपालिकेचे दोन साठवण तलाव आहेत. प्रवरा डाव्या कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाचे पाणी कालव्याच्या अकराशे क्युसेस या पूर्ण क्षमतेने नॉर्दन ब्रँचपर्यंत आल्यास ३ दिवसात म्हणजे ७२ तासात श्रीरामपूरचे साठवण तलाव भरतात. त्यातून ४५ दिवस पुरेल एवढा पाणी साठा होतो. पण यावेळी जेमतेम २५ तासच पाणी मिळाले. तेही ८० क्युसेसने मिळाले. पूर्वीचा ४ दिवस पुरेल एवढा पाणी साठा शिल्लक होता. त्यामुळे श्रीरामपूर नगरपालिकेस फक्त १२ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा आहे. आणखी ४६ तास पाणी मिळाले असते तर ५ आॅगस्टपर्यंत पुरेल, एवढा पाणी साठा साठवण तलावात झाला असता, असे श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले.(प्रतिनिधी)