शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

नुकसानभरपाईसाठी महिला शेतकऱ्याची वणवण भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST

जया आढाव व त्यांच्या कुटुंबीयांची पिंपळगाव उज्जैनी येथील गट क्रमांक ६४४ व ६४५ मधील तीन हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाचे ३ ...

जया आढाव व त्यांच्या कुटुंबीयांची पिंपळगाव उज्जैनी येथील गट क्रमांक ६४४ व ६४५ मधील तीन हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाचे ३ हजार झाडे होते. या संपूर्ण बागेला ठिंबक सिंचन बसविण्यात आले होते. ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता शेतालगत असलेल्या वनक्षेत्राला आग लागली. ही आग थेट आढाव यांच्या शेतात आली. यामध्ये डाळिंबाची झाडे, पाइपलाइन सिंचन संच, मजुरांची झोपडी, जनावरांचा चारा, तळ्याचे कापड असे सर्वकाही खाक झाले. या घटनेनंतर आढाव यांनी तलाठी, तहसीलदार व कृषी विभागात अर्ज देऊन स्थळपाहणी करून पंचनामा करण्याची मागणी केली. यावर मात्र कुणीच दखल घेतली नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. या अर्जावर आपत्ती व्यवस्थापनचे तहसीलदार व्ही. के. सोमन यांनी २७ एप्रिल रोजी उपवनसंरक्षक यांना पत्र देऊन नियमानुसार योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. या पत्राच्या संदर्भात वनविभागाने मात्र काहीच दखल न घेतल्याने आढाव यांना नुकसानभरपाईसाठी सरकारी कार्यालयात भटकंती करण्याची वेळ आली आहे.

--------------------------

अधिकारी म्हणतात, आम्ही काही करू शकत नाही

आपत्ती व्यवस्थापनाने वनविभागाला पत्र दिल्यानंतर जया आढाव यांनी वनविभागात नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा केला. तेथील अधिकाऱ्यांनीही हात वर करत ही तर नैसर्गिक आपत्ती होती. त्यात आम्ही काही करू शकत नाही. असे सांगितले. त्यामुळे जया आढाव या हवालदिल झाल्या असून, नुकसानभरपाईसाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------------------

बँकेचे २० लाख रुपये कर्ज काढून डाळिंबाची बाग फुलविली होती. मात्र वनक्षेत्राला लागलेल्या आगीमुळे डोळ्यादेखत आमचे उभे पीक खाक झाले. यात आमची काय चूक होती. आमचे ४० लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. वनविभागाने या परिसरात जाळपट्टे तयार केले असते तर आग आमच्या शेतापर्यंत आली नसती. आता नुकसान भरपाईसाठी मी आणि माझे पती जनार्दन आढाव सरकारी कार्यालयात हेलपाटे मारत आहोत, मात्र आमची कुणीच दखल घेत नाही.

- जया जनार्दन आढाव, नुकसानग्रस्त शेतकरी

.......................

फोटो २५ नुकसान १,२,३

पिंपळगाव उज्जैनी येथे वनक्षेत्राला आग लागून लगत असलेल्या शेतातील डाळिंब बाग, ठिबक संच व शेततळ्याचे कापड अशा पद्धतीने खाक झाले.