शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
2
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
3
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; महिलांनी केला छांगुर गँगचा पर्दाफाश
4
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
5
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
6
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
7
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
8
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर १५० देश..; इतके टक्के शुल्क लादण्याची तयारी, भारतावर किती?
10
लव्ह मॅरेज केलं अन् कंगाल झाला; पैसा मिळवण्यासाठी तरुणाने 'असा' मार्ग निवडला, जो थेट तुरुंगात घेऊन गेला!
11
'मुंबईत मराठीतून नमाज पठण करा'; नितेश राणेंवर असदुद्दीन ओवेसींचा पलटवार; म्हणाले...
12
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
13
मार्क झुकरबर्गविरोधात खटला सुरू; ८ अब्ज डॉलर्सचं आहे प्रकरण, काय आहे कारण?
14
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
15
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
16
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
17
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
18
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
19
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
20
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'

नुकसानभरपाईसाठी महिला शेतकऱ्याची वणवण भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST

जया आढाव व त्यांच्या कुटुंबीयांची पिंपळगाव उज्जैनी येथील गट क्रमांक ६४४ व ६४५ मधील तीन हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाचे ३ ...

जया आढाव व त्यांच्या कुटुंबीयांची पिंपळगाव उज्जैनी येथील गट क्रमांक ६४४ व ६४५ मधील तीन हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाचे ३ हजार झाडे होते. या संपूर्ण बागेला ठिंबक सिंचन बसविण्यात आले होते. ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता शेतालगत असलेल्या वनक्षेत्राला आग लागली. ही आग थेट आढाव यांच्या शेतात आली. यामध्ये डाळिंबाची झाडे, पाइपलाइन सिंचन संच, मजुरांची झोपडी, जनावरांचा चारा, तळ्याचे कापड असे सर्वकाही खाक झाले. या घटनेनंतर आढाव यांनी तलाठी, तहसीलदार व कृषी विभागात अर्ज देऊन स्थळपाहणी करून पंचनामा करण्याची मागणी केली. यावर मात्र कुणीच दखल घेतली नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. या अर्जावर आपत्ती व्यवस्थापनचे तहसीलदार व्ही. के. सोमन यांनी २७ एप्रिल रोजी उपवनसंरक्षक यांना पत्र देऊन नियमानुसार योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. या पत्राच्या संदर्भात वनविभागाने मात्र काहीच दखल न घेतल्याने आढाव यांना नुकसानभरपाईसाठी सरकारी कार्यालयात भटकंती करण्याची वेळ आली आहे.

--------------------------

अधिकारी म्हणतात, आम्ही काही करू शकत नाही

आपत्ती व्यवस्थापनाने वनविभागाला पत्र दिल्यानंतर जया आढाव यांनी वनविभागात नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा केला. तेथील अधिकाऱ्यांनीही हात वर करत ही तर नैसर्गिक आपत्ती होती. त्यात आम्ही काही करू शकत नाही. असे सांगितले. त्यामुळे जया आढाव या हवालदिल झाल्या असून, नुकसानभरपाईसाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------------------

बँकेचे २० लाख रुपये कर्ज काढून डाळिंबाची बाग फुलविली होती. मात्र वनक्षेत्राला लागलेल्या आगीमुळे डोळ्यादेखत आमचे उभे पीक खाक झाले. यात आमची काय चूक होती. आमचे ४० लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. वनविभागाने या परिसरात जाळपट्टे तयार केले असते तर आग आमच्या शेतापर्यंत आली नसती. आता नुकसान भरपाईसाठी मी आणि माझे पती जनार्दन आढाव सरकारी कार्यालयात हेलपाटे मारत आहोत, मात्र आमची कुणीच दखल घेत नाही.

- जया जनार्दन आढाव, नुकसानग्रस्त शेतकरी

.......................

फोटो २५ नुकसान १,२,३

पिंपळगाव उज्जैनी येथे वनक्षेत्राला आग लागून लगत असलेल्या शेतातील डाळिंब बाग, ठिबक संच व शेततळ्याचे कापड अशा पद्धतीने खाक झाले.